राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काल उधाण आले होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी, “या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही”, अशी स्पष्टोक्ती दिली. दरम्यान, यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्मिल टीप्पणी केली आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलाताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – Maharashtra Breaking News Live : “मुख्यमंत्र्यांनी श्रीसदस्यांच्या मृत्यूचा आकडा लपवला”, संजय राऊतांचा गंभीर आरोप, म्हणाले…

sunil tatkare and ajit pawar devendra fadnavis morning oath
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर सुनिल तटकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आम्ही दोन्ही…”
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
PM Narendra Modi Yavatmal Rally
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो, देणगीसाठी स्कॅनर कोडही दिला
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

काय म्हणाले गुलाबराव पाटील?

मला वाटतं अजून तिथी जवळ आलेली नाही. गुणही जुळत नाही. त्यामुळे कोणती पुजा करावी लागले, हे एखाद्या ब्राम्हणाला विचारायला लागेल. पण वेळ येईल काळजी करू नका, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच अजित पवारांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त खरंच आहे का? असं विचारलं असता, ही वेळी लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे. पण गुण जुळत नसल्याचं ब्राम्हणाचं म्हणणं आहे, अशी मिश्कील टीप्पणीही त्यांनी केली.

हेही वाचा – “…तर फडणवीसांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन धुडगूस घातला असता”; श्रीसदस्यांच्या मृत्यू प्रकरणावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!

अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

दरम्यान, अजित पवार यांनीही काल याबाबत स्पष्टीकरण दिलं. “राष्ट्रवादी पक्षाची स्थापना स्वाभिमानातून झाली आहे. १० जूनला १९९९ पासून आम्ही काम करतोय. आजही आम्ही काम करतोय, उद्याही करत राहणार. जोपर्यंत आमच्या जिवात जीव आहे, तोपर्यंत आम्ही पक्षाचं काम करत राहणार”, असं ते म्हणाले. तसेच “या बातम्या विपर्यास करून दाखवल्या जातात. अशा चर्चा सुरू झाल्याने जवळचे कार्यकर्ते नाराज होतात. संभ्रामवस्थेत जातात. परंतु, यात काहीही तथ्य नाही. प्रत्येकाने आपआपलं काम करा, महाविकास आघाडी बळकट होण्याकरता प्रयत्न करा”, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.