ओमायक्रॉन आणि त्यासोबत आलेली करोनाची तिसरी लाट सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय ठरली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नव्याने निर्बंध देखील लागू करण्यात आले होते. मात्र, आता एकीकडे बाधितांची संख्या कमी होऊ लागलेली असल्यामुळे निर्बंध पुन्हा शिथिल करण्याची मागणी होऊ लागली असताना दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोनाबाबत राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी माहिती देताना त्यांनी बाधितांची आकडेवारी आणि टक्केवारी देखील सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू येऊन गेला आहे असं म्हणता येईल. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी अचानक बाधितांची संख्या वाढत होती. ती आता तशी नाही. पण राज्याच्या इतर भागात त्याची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही वाढत आहे. पण सर्वजण ५ ते ७ दिवसांच्या उपचारांवर बरे होत आहेत. त्यामुळे इतर भागात वाढणारी बाधितांची सख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही”, असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health minister rajesh tope on corona third wave omicron new variant mask free pmw
First published on: 29-01-2022 at 13:29 IST