झोपडपट्टी धारकांविषयी जो निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तो चांगला आहे. मी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आता झोपडी विकण्यासंबंधीचाही निर्णय त्यांनी घ्यावा अशी मी विनंती त्यांना करतो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी टोलाही लगावला आहे. नालेसफाई आणि कचरा हे ठाण्यातल्या सत्ताधाऱ्यांचं खाण्याचं कुरण आहे. ते कचराही खातात आणि नाल्यातूनही पैसा खातात असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

अनंत करमुसे मारहाण प्रकरणी काय म्हणाले आव्हाड?

मुख्य न्यायालयाने नाकारले मग तो माणूस सर्वोच्च न्यायालयात गेला, सर्वोच्च न्यायालयात त्याचे वकील कोण कोण होते यांची यादी काढा मग तुम्हाला समजेल हा पैसा कुठून आला, जो अधिकारी चौकशी करत होता त्या अधिकाऱ्याची पोस्टिंग कुठे कुठे होते ते बघा, म्हणजे एका राजकीय पक्षाच्या ताटाखालचं मांजर असलेला अधिकारी चौकशी करत होता. चौथी चार्जशीट दाखल झाली आहे. काल मी अचानकच एक मेडिकल सर्टिफिकेट पाहिलं. ते इतके दिवस कुठे होतं? हे आश्चर्याचंच आहे. इतके दिवस कुठे होतं हे सर्टिफिकेट? मी असल्या केसेसना घाबरत नाही. मुख्यमंत्री कामाला लागतात. मला संपवण्यासाठी इतक्या करामती मुख्यमंत्र्यांना कराव्या लागत आहेत त्यामुळे मी खुश आहे असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
chandrapur lok sabha marathi news, devendra fadnavis chandrapur lok sabha marathi news
मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत
Thackeray Group Criticizes shinde group as devendra fadnvis announced shrikant shinde Candidature for Kalyan Lok Sabha
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाची उमेदवारी जाहीर केल्याने ठाकरे गटाची शिंदेवर टीका
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप

मला फसवण्याचे १०० प्रयत्न केले जातील पण मी गप्प बसणार नाही

मला फसवण्याचे १०० प्रयत्न करतील. पण मी गप्प बसणाऱ्यांमधला माणूस नाही. ज्या कोर्टाने सांगितलं की एकनाथ शिंदे यांची निवड अवैध आहे, त्यांची मुख्यमंत्रीपदाची निवडच अवैध आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. यांच्याकडे नैतिकता उरलेली नाही. ती कुणाकडे होती तर उद्धव ठाकरेंकडे. त्यांनी हे सांगितलं की माझी माणसंच निघून गेली आहेत तर मी कशाला मुख्यमंत्री राहू? त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं. इथे सर्वोच्च न्यायलायने सांगितलं आहे की एकनाथ शिंदे यांची निवड अवैध आहे तरीही ते पद सोडत नाहीत असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.