छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रात्री झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेमुळे राज्यातलं वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पार्टी, एआयएमआयएम, शिवसेना (ठाकरे गट) पक्षांचे नेते एकमेंकांवर आरोप करत आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते चंद्रकांत खैरे यांनी आरोप केला आहे की, या सर्व घटनेचे मास्टरमाईंड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तसेच एमआयएम पार्टी हीदेखील यामागे असून एमआयएम भाजपाची बी टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय वित्त राज्यमंत्री आणि भाजपा नेते भागवत कराड यांनी देखील इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आपल्यावर होत असलेले आरोप एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी फेटाळले आहेत. तसेच ते म्हणाले की, हे सर्व लोक सॉफ्ट टार्गेट शोधत आहेत. आपले दोष लपवण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काह वाईट घडलं की, आमच्याकडे बोट दाखवलं जातं आणि काही चांगलं घडलं की ते त्यांच्यामुळे घडलं असं सांगतात.

kerala politics rahul gandhi
“राहुल गांधींचा ‘डीएनए’ तपासायला हवा, ते गांधी असण्याबद्दल संशय”, केरळमधील नेत्याची टीका
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
ajit pawar and supriya sule
स्नुषाविरोधात प्रचार करण्यास नकार देण्याची एकनाथ खडसेंची भूमिका सुसंस्कृतपणाची;  खासदार सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना चिमटा
governor rule in delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तयारी? नेत्यांच्या विधानांमुळे तर्क-वितर्कांना उधाण; केजरीवालांच्या अटकेमुळे परिस्थिती चिघळणार?

हे ही वाचा >> “माझ्यावरही दगडफेक झाली”, इम्तियाज जलील यांनी सांगितली आपबिती, म्हणाले, “पोलिसांना…”

“या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा”

इम्तियाज जलील म्हणाले की, एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा मी मागणी करतो की, या घटनेचा तपास करण्यासाठी एक उच्चस्तरीय चौकशी नेमा. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा. कारण सत्य बाहेर येण्याची आवश्यकता आहे. काही समाजकंटकामुळे शहर वेठीस धरलं जात आहे जे चुकीचं आहे. चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करा. कुठल्याही नेत्याच्या आरोपावर मी सध्या उत्तर देणार नाही. सरकारने चौकशी समिती नेमावी, त्यातून सत्य बाहेर येईलच.