सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि लगतच्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी सीमेवर रामलिंग अभयारण्यासह आसपासच्या गाव शिवारामध्ये गेल्या सव्वा महिन्यापासून दहशत माजविणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आलेले शीघ्र बचाव पथक आठ दिवस प्रयत्न केल्यानंतर अखेर पुन्हा चंद्रपूरला परतले. त्या ऐवजी आता पुण्याहून दुसरे शीघ्र बचाव पथक दाखल झाले आहे. दरम्यान, राज्याच्या पश्चिम विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) डॉ. क्लेमेंट बेन आणि पुणे वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण यांच्यासह अन्य वरिष्ठ वन अधिकारी बार्शी व येडशी परिसरात दाखल झाले आहेत.

हेही वाचा : ५ लाख कोटींचे करार, दावोस परिषदेत राज्यात विक्रमी गुंतवणुकीची चिन्हे

Cargo trains will run on separate tracks from mid-February
फेब्रुवारीच्या मध्यावर मालगाड्या स्वतंत्र वाहिनीवर धावणार
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Tigress falls into well while chasing wild boar
Video : रानडुकराचा पाठलाग करताना वाघीण पडली विहिरीत…
Two people die after being shot by colleague as mistaking them for animals
प्राणी समजून गोळी झाडल्याने दोघांचा मृत्यू? गावठी कट्ट्यांच्याद्वारे शिकारी दरम्यानची घटना
tiger attack speeding bike Pimpalgaon Lakhni Taluka bhandara two injured
भंडारा : रात्रीचा थरार! वेगाने जाणाऱ्या दुचाकीवर अचानक वाघाने घेतली झेप…
Tipeshwar sanctuary hunters noose stuck around neck of tigress named PC
वाघिणीच्या गळ्यात अडकला शिकारीचा फास, वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
Forest department ignorance about elephant capture campaign in Sindhudurg district
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती पकड मोहिमेबद्दल वनविभाग उदासीन; १० फेब्रुवारी पासून साखळी उपोषण

यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर व्याघ्र प्रकल्पातून तब्बल ५०० किलोमीटर दूर अंतरावर भटकत बार्शी-येडशी परिसरातील बालाघाट व रामलिंग अभयारण्यात स्वतःचा अधिवास शोधत आलेला वाघ गेल्या सव्वा महिन्यापासून वास्तव्यास आहे. परिसरातील सुमारे १५ गावांच्या शिवारात वाघाने आतापर्यंत २५ जनावरांची शिकार केली आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी शासनाने गेल्या १४ जानेवारी रोजी चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील शीघ्र बचाव पथकाला प्राचारण केले होते. निष्णात आणि अनुभवी तज्ज्ञ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या या बचाव पथकाने स्थानिक सुमारे ४५ कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ सोबत घेऊन वाघाला जेरबंद करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. वाघाच्या पायांचे ठसे सापडून त्या दिशेने माग काढला तरी वाघाने बचाव पथकाला वेळोवेळी गुंगारा दिल्याचे दिसून आले. एकीकडे ठिकठिकाणी सापळा कॅमेरे लावून दररोज २० ते २५ किलोमीटर अंतर पायी गस्त घालत असताना दुसरीकडे गुंगारा देणाऱ्या वाघाने गायी, म्हशी, शेळ्यांसह अन्य जनावरांची शिकार करून दहशतीचे सत्र सुरूच ठेवले आहे.

या पार्श्वभूमीवर अखेर चंद्रपूरहून डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या अधिपत्याखाली आलेले शीघ्र बचाव पथक मंगळवारी चंद्रपूरला माघारी गेले. त्या ऐवजी आता पुण्याहून दुसरे बचाव पथक बार्शी व येडशी परिसरात वाघाला जेरबंद करण्यासाठी पोहोचले आहे.

Story img Loader