देशात भगवान शंकराची १२ ज्योतिर्लिंग आहेत. त्यापैकी तीन ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. या १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग म्हणजेच पुण्यातल्या भीमाशंकर मंदिरावरून सध्या वाद सुरू झाला आहे. कारण ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने दावा केला आहे. भाजपाशासित आसाम सरकारने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी दावा केला आहे की १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.

भाजपाशासित आसाम सरकारची जाहिरात पाहिल्यानंतर राज्यातले शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतापले आहेत. त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, कांग्रेस नेते सचिन सावंत यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.

chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दोन ट्वीट केले आहेत. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंग हे आसाममध्ये असल्याचा दावा करून महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या श्रद्धेवर घाव घातला आहे. महाराष्ट्रातील उद्योगांवर अधिकार सांगणे पाहिलं होतं. पण महाराष्ट्रातील श्रद्धास्थानावरही दावा इतर राज्ये करू लागली आहेत. हे महाराष्ट्राच्या कमकुवत पणाचे लक्षण तर नाही ना?”

हे ही वाचा >> “ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले?” भाजपाचा सुप्रिया सुळेंना सवाल!

आव्हाडांचा तिखट सवाल?

आव्हाड यांनी म्हटलं आहे की, “हे आमचे श्रद्धेचे स्थान आहे. त्यामुळे सरकारने १२ कोटी जनतेच्या वतीने आसामच्या मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितले पाहिजे. आता पौराणिक कथा देखील राजकारणाचा भाग होऊ लागल्या आहेत.” आव्हाड एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी “कामख्या देवी महाराष्ट्रात आहे का सांगू नये?” असा सवाल देखील केला आहे. हा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. कारण शिवसेनेशी बंडखोरी करून शिंदे आणि इतर ४० आमदार आसाममधलं प्रसिद्ध शहर गुवाहाटी येथे लपून बसले होते. तिथे या आमदारांनी कामाख्या देवीची पूजादेखील केली होती.