हिंगोली : जिल्ह्यातील पिंपळदरी येथील वीरमाता रूख्माबाई भालेराव यांचा मुलगा कविचंद यांना सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना अनंतबाग येथे वीरमरण आले. त्यांचा एक मुलगा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. करोनाच्या टाळेबंदीत आणि जिल्हाप्रवेश बंदीत तो अन्य जिल्ह्यांत अडकून पडल्याने या वीरमातेला जीवन जगणे असह्य झाले होते. रुख्माबाईंची ही परवड लोकसत्ताह्ण मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वीरमातेला शासनाकडून चार एकर जमिनीचे कागदपत्र पालकमंत्री वर्षां गायकवाड यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी देण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रुख्माबाईंच्या एका मुलाला वीरमरण आले तर दुसरा मुलगा टाळेबंदीमुळे इतर जिल्ह्यात अडकल्याने त्या आपल्या नातवासोबत गावीच राहात होत्या. घरी कोणी कमावते नसल्याने त्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. याविषयीची बातमी लोकसत्ताह्णमध्ये प्रसिद्ध झाली. या बातमीची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दखल घेऊन रुख्माबाईंना शासन स्तरावरून सर्वतोपरी मदत केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kavichand son rukhmabai bhalerao serving border security force here came the heroic death akp
First published on: 28-01-2022 at 00:22 IST