Mumbai Maharashtra Updates, 07 December 2022 : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद चिघळल्याचं पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता आक्रमक भूमिका घेतली जात आहे. शरद पवार यांनी तर कर्नाटकमध्ये जाण्याचा अल्टिमेटमच दिला आहे. त्यामुळे राज्यातील शिंदे सरकारवर सीमाप्रश्नावरून टीका केली जात आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलं, तरी या मुद्द्यावरून दिल्लीतील राजकीय घडामोडीही वाढू लागल्या आहेत.