Mumbai News Live Today: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कारने या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युंत्तर दिले आहे. ज्यामध्ये पाकिस्तान व पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. याचबरोबर १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. यानंतर काल रात्री पाकिस्तानने सीमा भागांत ड्रोन हल्ले करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
यानंतर मुंबई शहरातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे.
याचबरोबर राज्यातील विविध घडामोडींचा आढावा घेऊया.
Mumbai-Pune News Highlights Today 09 May 2025 : महाराष्ट्र लाईव्ह अपडेट्स ९ मे २०२५.
ठाणे शहरातील रिक्षाचालकांकडून लुटमार ; नवी मुंबईत जाण्यासाठी दुप्पट भाडे
"प्रत्येक जिल्ह्यात मॉकड्रील, वॉर रुम आणि.."; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतरचे निर्देश काय?
डोंबिवलीत रिक्षा, उबर मोटार चालकांना मारहाण करत चॉपर, दगड-विटांनी हल्ला
"आम्ही तयार आहोत...", भारत-पाकिस्तान तणावावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
भारत-पाकिस्तान तणावावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पोलीस असोत, तटरक्षक दल असो किंवा नौदल असो, सर्व सुरक्षा दल सतर्क आहेत. नियमित सराव केले जात आहेत, एसओपी निश्चित करण्यात आले आहेत. आम्ही युद्धपुस्तकानुसार आवश्यक ती सर्व पाऊले उचलली केले आहे."
पिंपरी: शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मिठाचा खडा कोण टाकत आहे?, अजित पवारांचे खंदे समर्थक बनसोडे थेट बोलले…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा आढावा बैठक संपन्न
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील त्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजनांवर बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डीजीपी, गृह विभागाचे उच्च अधिकारी आणि विविध संस्था आणि विभागांचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम; मुख्यमंत्र्यांनी मानले सैन्याचे आभार
भारतीय लष्कराने पाकिस्तानी ड्रोन हल्ल्यांना सडेतोड उत्तर दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस यांनी जवानांचे कौतुक केले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये ते म्हणाले, "आपल्या वीर जवानांचे योगदान शब्दांत मांडणे अशक्य आहे. त्यांच्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला, त्यागाला आणि त्यांच्या कुटुंबियांना माझा सलाम. आपल्या सैनिकांचे पराक्रम देशाच्या मनात सदैव कोरले जातील राहतील. कोटी कोटी धन्यवाद! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ नेतृत्वाखाली देश सुरक्षित आणि सक्षम वाटतो."
भारत-पाक तणाव… साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन दिसला ? यंत्रणा सतर्क…शोध मोहीम सुरू…
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्मण झाली असताना मुंबईतील साकीनाका परिसरात अज्ञात ड्रोन दिसल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. सहार विमानतळाने याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर संबंधित परिसरात पोलिससांनी शोध मोहीम राबविली. पण पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन होणार, सरकारची माहिती
महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे की, यापुढे अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाईल. महाराष्ट्रात कुठेही अकरावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. यासाठी उमेदवारांना १०० रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल. ही एक केंद्रीकृत प्रक्रिया असल्याने, प्रत्येक उमेदवाराला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांची किमान एक आणि जास्तीत जास्त १० पसंतीक्रम द्यावी लागतील. पूर्वी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज सादर करावे लागत होते.
बदलापूर एन्काऊंटर प्रकरणात दुसऱ्या एफआयआरची आवश्यकता नाही; सर्वोच्च न्यायालयाचा सुधारित आदेश
बदलापूर एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस महासंचालकांकडून स्थापन करण्यात येणाऱ्या नवीन विशेष तपास पथकाला (एसआयटी) या प्रकरणात नवीन एफआयआर नोंदवावा लागणार नाही. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी आणि न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिला.
नक्षलवादी संबंधांच्या आरोपाखाली केरळच्या विद्यार्थी कार्यकर्त्याला नागपुरात अटक
केरळमधील २६ वर्षीय विद्यार्थी कार्यकर्त्या आणि स्वतंत्र पत्रकार रजाज एम शीबा सिद्दीक यांना बुधवारी नागपुरात "सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी" केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. कोचीमधील एडापल्ली येथील रहिवासी असलेले सिद्दीक हे त्यांची नागपूरची विद्यार्थिनी आणि सध्या पुण्यात शिक्षण घेत असलेली मैत्रिण ईशा कुमारी (२२) हिच्यासोबत लकडगंज परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबले होते.
कल्याण–सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल सेवा विस्कळीत; प्रवाशांची धावपळ
शुक्रवारी सकाळी मध्य रेल्वेने ठाणे आणि वाशी दरम्यान लोकल सेवा स्थगित केल्याने हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान बांधण्यात येणाऱ्या पुलासाठी गर्डर सुरू करण्यात आला होता. ठाणे आणि नवी मुंबई दरम्यानच्या मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा अचानक बंद झाल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बस आणि ऑटोसह इतर वाहतुकीच्या साधनांचा शोध घ्यावा लागला, असे प्रवाशांनी सांगितले.
पोर्शे मोटार अपघात प्रकरणात मित्तल, सिंग यांचा जामीन फेटाळला
"ही आपली जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्य", संजय राऊत यांचं आवाहन
ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीबद्दल बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत म्हणाले की, "युद्धाच्या वेळी, आपण सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांना पाठिंबा दिला पाहिजे. असे असले तरी युद्धभूमीवर सरकार नाही तर आपले भारतीय लष्कर असते. संपूर्ण देशाने त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, ही आपली जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे".
Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या आजचा भाव
India Pakistan Tension: 'पाकिस्तान नकाशावरपण राहणार नाही', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जहाल टीका; म्हणाले, 'त्यांचे खायचे वांदे'
‘पंढरपूर कॉरिडॉर’साठी बाधितांचे सर्वेक्षण सुरू, बारा पथकांद्वारे काम; काही बाधितांचा विरोध
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक घेणार आहेत. वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे.
महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स (Photo: ANI)