Maharashtra News Updates, 15 March 2023: महाराष्ट्रात सध्या तीन मुद्द्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. आज ठाकरे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद असेल. दुसरीकडे राज्याचया अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या वहिल्या अर्थसंकल्पावर चर्चा चालू आहे. तर हे सगळं घडत असताना राज्यात शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्ये पेन्शन योजनेसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

सर्वोच्च न्यायालय व्यवस्थापनाकडून कामकाजाचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे.

Shashikant Shinde denied all allegations of corruption in Mumbai Bazaar Committee
मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप शशिकांत शिंदे यांनी फेटाळले
Ambadas Danve on asaduddin owaisi
‘खान पाहिजे की बाण?’, बाळासाहेबांची ही भूमिका उबाठा गटाने का बदलली? अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट
Vijay Wadettiwar
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निवडणुकीपूर्वीच केली ‘चांगल्या खात्या’ची मागणी, जाणून घ्या कारण ?
Congress Candidate, ramtek, lok sabha 2024, Rashmi Barve, Caste Certificate Rejection, Case, High Court, election officer, politics, marathi news, maharashtra politics,
रामटेकच्या काँग्रेस उमेदवाराचे भवितव्य न्यायालयाचा निकाल ठरवणार; सोमवारी सुनावणी
Live Updates

Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

18:44 (IST) 15 Mar 2023
"राज्यपाल Whip बाबत का बोलतायत? हा विषय तर...", कपिल सिब्बल यांचा न्यायालयात परखड युक्तिवाद; 'या' नियमाचा दिला दाखला!

कपिस सिब्बल म्हणतात, "एकनाथ शिंदेंना पदावरून दूर करून अजय चौधरींना नियुक्त केल्याचं पत्र शिवसेनेनं अध्यक्षांना दिलं होतं. त्यांनी ते स्वीकारलंही होतं. मग राज्यपालांनी कोणत्या कायद्यानुसार...!"

वाचा सविस्तर

16:03 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: आजची सुनावणी संपली..

सर्वोच्च न्यायालयातील आजची सुनावणी संपली असून उद्या सकाळी पुन्हा कपिल सिब्बल आपला युक्तिवाद चालू ठेवणार आहेत.

15:59 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: त्यांना राज्यपालांनी सांगायला हवं होतं की... - सिब्बल

जर तुम्ही गट असाल किंवा पक्ष असाल तर राज्यपालांनी त्यांना सांगायला हवं होतं की मी तुम्हाला मान्यता देऊ शकत नाही. यावर आधी निवडणूक आयोगानं निर्णय घ्यायला हवा होता. त्याआधी अपात्रतेचा निर्णय व्हायला हवा होता - कपिल सिब्बल

15:55 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपाल व्हीपबाबत का बोलतायत? - सिब्बल

सुरुवातीपासूनच ही सगळी प्रक्रिया राजकीय राहिली आहे. राजकीय पक्षाकडून प्रतोदची नियुक्ती केली. पण राज्यपाल प्रतोदविषयी का बोलतायत? त्यांचा प्रतोदशी काय संबंध? हा सभागृहाचा विषय आहे. अजय गोगावलेंची नियुक्ती अवैध आहे असं ते म्हणतायत. त्यांचा असं बोलण्याचा काय संबंध? - कपिल सिब्बल

15:46 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: कोणत्याच कागदपत्रामध्ये त्यांनी ते शिवसेना असल्याचा कुठेही उल्लेख नाही - सिब्बल

२१ जूनपासून त्यांनी १९ जुलैपर्यंत केलेल्या कोणत्याच कागदपत्रामध्ये त्यांनी ते शिवसेना असल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. ही न्यायव्यवस्थेची, राज्यघटनेची मस्करी चालवली आहे. हे फक्त महाराष्ट्राविषयी नाही, इतर कुठल्याही राज्याविषयी घडू शकतं. जर हे घडू दिलं, तर हेच आपलं भविष्य आहे - सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635947664130060288

15:44 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: आयाराम-गयाराम संस्कृती पुन्हा येतेय - सिब्बल

शिंदे गट शिवसेना पक्ष नाही, ते गट आहेत. त्यांना कोणत्या आधारावर राज्यपालांनी मान्यता दिली? असं करून आपण पुन्हा आयाराम-गयाराम संस्कृती आणतोय. असं करून सरकार पाडायचं आणि त्यानंतर कोणताही आक्षेप घ्यायचा नाही - सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635947487147233280

15:42 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: सर्व निकाल हे संदर्भानुसार ठरत असतात - सिब्बल

सर्व निकाल हे संदर्भानुसार ठरत असतात. शिवराज चौहान प्रकरणात २२ राजीनामे आणि त्यातले ६ स्वीकारले हा संदर्भ होता - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635948650550689793

15:39 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: ..मग त्यांना आयोगाकडे जायची गरजच नव्हती - कपिल सिब्बल

त्यांचं म्हणणं आहे की पक्षात फूट नाही, पक्षांतर्गत दोन गट आहेत. पण निवडणूक आयोगासमोर ते म्हणाले की आम्ही पक्षातून फुटून निघालेलो गट आहोत. कारण जर ते पक्ष आहेत, तर त्यांना निवडणूक आयोगाकडे जाण्याची गरजच नव्हती - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635949517790134274

15:37 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: कोणत्या आधारावर ३४ आमदार म्हणतात की ते शिवसेना पक्ष आहे? - सिब्बल

घटनेच्या कोणत्या आधारावर ३४ आमदार म्हणतात की ते शिवसेना पक्ष आहे? शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. ४ जुलैपर्यंत कुणीही त्या निर्णयावर आक्षेप घेतला नव्हता किंवा तो बदलला नव्हता. मग शिंदे गट असा दावा कसा करू शकेल की आम्ही शिवसेना आहोत? आम्ही शिवसेना आहोत म्हणून आम्ही म्हणतोय की आम्ही शिवसेना आहोत - सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635946594335068161

15:35 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी कोणत्या अधिकाराखाली एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवलं?

३ जुलैला सुनील प्रभूंनी भाजपा उमेदवाराला मतदान न करण्याचा व्हीप बजावला. पण त्याचं उल्लंघन केलं गेलं. एकनाथ शिंदेंना पदावरून दूर करून अजय चौधरींना नियुक्त केल्याचं पत्र अध्यक्षांना दिलं होतं. त्यांनी ते स्वीकारलंही होतं. मग राज्यपालांनी कोणत्या अधिकाराखाली एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवलं? - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635945139326840832

15:32 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राजकीय पक्षच प्रतोदची नियुक्ती करत असतात - कपिल सिब्बल

शिंदे गट किंवा राज्यपालांकडून कुणीच प्रतोदच्या मुद्द्यावर भूमिका मांडली नाही. ते म्हणतात विधिमंडळ गटनेते प्रतोदची नियुक्ती करतात. पण राजकीय पक्ष आणि पक्षप्रमुख प्रतोदची नियुक्ती करत असतात - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635944410906251264

15:27 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: सभागृहातल्या आकड्यांमुळे सरकार पडत नाही, आघाड्यांमुळे पडतं - सिब्बल

सभागृहातील आकडे सरकार पाडत नाहीत, राजकीय पक्षांच्या आघाड्या सरकार बनवतात किंवा पाडतात. त्यामुळेच राज्यपालांच्या निर्णयामुळे काय घडतं ते बघा - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635943289395486720

15:26 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपाल पक्षव्यतिरिक्त कुणालाच मान्यता देऊ शकत नाही - सिब्बल

बहुमत राजकीय पक्षालाच असतं. निवडणूकपूर्व आघाड्या राजकीय पक्षांच्या होतात. निवडणुकीनंतरच्या आघाड्याही राजकीय पक्षांच्याच असतात. निवडणुकीनंतरच्या युत्याही राजकीय पक्षांच्याच असतात. राज्यपाल राजकीय पक्षाव्यतिरिक्त कुणालाही मान्यता देऊ शकत नाही - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635942777338101760

15:23 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: लोकशाही चौकटीतील आकडे महत्त्वाचे - सिब्बल

कोणत्याही लोकप्रतिनिधीची एकमेव ओळख सभागृहाला सांगितली जाते, ती म्हणजे तो अमुक एका पक्षाचा सदस्य आहे. त्याव्यतिरिक्त कोणतीही ओळख असत नाही. २०-३०-४० सदस्यांना त्याव्यतिरिक्त कोणतीही ओळख असू शकत नाही. गोव्यातल्या एका छोट्या पक्षाला ५ सदस्य आहेत. त्यातले दोन राज्यपालांकडे गेले आणि म्हणाले आमचा सरकारला पाठिंबा नाही. मग राज्यपाल बहुमत चाचणी घेणार का? इथे पुन्हा आयाराम-गयाराम चालू झालं. लोकशाही फक्त आकड्यांवर अवलंबून नसते. लोकशाही चौकटीतल्या आकड्यांवर अवलंबून असते - कपिल सिब्बल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635942401931112448

15:18 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: तुषार मेहतांचा युक्तिवाद संपला!

राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आता कपिल सिब्बल यांनी रिजॉइंडर सादर करण्यास सुरुवात केली.

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635940757818470400

15:15 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे विधिमंडळ पक्षाचे सदस्य नाहीत - मेहता

राज्यपाल फक्त विधिमंडळ नेत्यांबाबतच बोलू शकतात, पण उद्धव ठाकरे तर विधिमंडळ पक्षाचे सदस्यही नाहीत - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635939817241604096

15:13 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलवलं - मेहता

राज्यपालांना फक्त विधिमंडळ गटनेतेच माहिती असतात. त्यांचं राजकीय पक्षाशी देणं-घेणं नसतं. त्यामुळेच राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना सरकार स्थापन करण्यासाठी बोलावलं, राजकीय पक्षाला किंवा पक्षाध्यक्षांना बोलवलं नाही. - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635939446188306432

15:10 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: अधिवेशन चालू असतानाच अविश्वास ठराव मांडला जाऊ शकतो - मेहता

सभागृहाचं कामकाज चालू असतानाच अविश्वास ठराव मांडला जाऊ शकतो. अशा ठरावाची लेखी माहिती द्यावी लागते. त्यानंतर त्यावर निर्णय घेण्यासाठी अध्यक्षांना आठवड्याभराची मुदत असते - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635938436376051713

15:06 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: ..तर थेट एकनाथ शिंदेंना शपथविधीसाठी बोलवलं असतं - मेहता

राज्यपालांनी फुटीला कोणतीही मान्यता दिली नाही. जर त्यांनी तसं काही केलं असतं, तर त्यांनी एकनाथ शिंदेंना थेट शपथविधीसाठी बोलवलं असतं - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635937865233473537

15:03 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: ४७ आमदारांनी पाठिंबा काढला हे महत्त्वाचं होतं - तुषार मेहता

४७ आमदारांना सरकारचा पाठिंबा काढायचा आहे हे सर्वात महत्त्वाचं होतं. त्याव्यतिरिक्त कोणताही मुद्दा बहुमत चाचणीसाठी महत्त्वाचा ठरला नाही - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635936626999459843

15:00 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: तुषार मेहतांनी अपवादात्मक स्थितीचा केला उल्लेख

फक्त अपवादात्मक परिस्थिती बहुमत चाचणीव्यतिरिक्त दुसरा एखादा मार्ग निवडला जाऊ शकतो. पण बहुतेक वेळा बहुमत चाचणी हाच एकमेव मार्ग असतो - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635936261558108160

14:58 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांनी कोणत्याही पक्षाला झुकतं माप दिलं नाही - मेहता

बहुमत चाचणीसंदर्ऊात निर्देश देताना राज्यपालांनी कोणत्याही पक्षाला झुकतं माप दिलेलं नाही. ते महत्त्वाचं होतं - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635935775941607424

14:51 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांसाठी बहुमत महत्त्वाचं - तुषार मेहता

राज्यपालांना फक्त बहुमत मिळवून चालत नाही, तर ते त्यांच्या पूर्ण कार्यकाळात त्यांच्याकडे बहुमत राहायला हवं. लोकशाही प्रक्रियेत काम करण्यासाठी हे आवश्यक आहे - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635933198994788352

14:43 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: शिवराज सिंह खटल्याचा दाखला...

तुषार मेहतांनी युक्तिवादादरम्यान मध्य प्रदेशातील शिवराज सिंह खटल्याचा दाखला दिला...

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635929323080417281

14:38 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: .. म्हणून राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले - मेहता

२२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना राजीनामे सादर केले होते. या सदस्यांनी राज्यपालांना सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. त्यापैकी ६ कॅबिनेट मंत्री होते. त्यांचे राजीनामे विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले होते. त्यामुळे सरकार अल्पमतात आल्याचं राज्यपालांचं मत झालं. त्यावर त्यांनी बहुमत चाचणीचे आदेश दिले - तुषार मेहता

14:29 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: बहुमत चाचणीवरून युक्तिवाद

जे बहुमत चाचणीला सामोरे गेलेच नाहीत, ते राज्यपालांना विचारत आहेत की तुम्ही बहुमत चाचणीचे आदेश का दिले? - राज्यपालांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचा युक्तिवाद

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635928442620502016

14:26 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: सरकारला पाठिंबा नसल्याचं आमदारांनी सांगितलं - मेहता

आमदार राज्यपालांना सांगत होते की आमचा सरकारवर विश्वास नाही. मुख्यमंत्र्यांकडे बहुमताचा पाठिंबा नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले जावेत - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635927520263680000

14:24 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: न्यायालयाच्या प्रश्नांवर तुषार मेहतांची उत्तरं...

पुराव्यांवरून हे दिसतंय की त्यांना सरकारला पाठिंबा द्यायचा नाहीये. त्यामुळेच त्यांना सुरक्षा हवी आहे - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635926807722758144

14:20 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: विधिमंडळ गटानं सरकारचा पाठिंबा काढला आहे, पक्षाचा नाही - मेहता

विधिमंडळ गटानं त्यांच्या पक्षावर अविश्वास दाखवलेला नाही. विधिमंडळ गटानं सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामध्ये फरक आहे - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635926003502690304

14:19 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: लंचब्रेकनंतर सुनावणीला पुन्हा सुरुवात

लंचब्रेकनंतर सुनावणीला पुन्हा सुरुवात

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635925854512644097

13:54 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर सरन्यायाधीशांनी ओढले कडक शब्दांत ताशेरे; म्हणाले, “तीन वर्षांचा सुखी संसार…”

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. काल झालेल्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला होता. तर आज राज्यपालांच्यावतीने तुषार मेहता यांनी बाजू मांडली. दरम्यान, यावेळी सरन्यायाधीशांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेल्या काही निर्णयावरून कडक शब्दात ताशेरे ओढले. सविस्तर वाचा

13:36 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: “…मग बहुमत चाचणीचा प्रश्न येतोच कुठे?” सरन्यायाधीशांचा राज्यपालांना सवाल; दिला ‘या’ नियमाचा दाखला!

“कायदेशीररीत्या स्थापन झालेलं सरकार सत्तेत आहे. असं असताना राज्यपाल एखाद्या गृहीतकावर आधारीत निर्णय…”, सर्वोच्च न्यायालयाची परखड टिप्पणी!

वाचा नेमकं काय म्हटलं सरन्यायाधीशांनी

12:56 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing:

आमदारांनी संगितलं की आम्हाला विद्यमान सरकारचा हिस्सा राहायचं नाही - तुषार मेहता

12:55 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: बहुमत चाचणीवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

तुमच्याकडे सभागृहात बहुमत आहे का? यासाठी बहुमत चाचणी असते. सभागृहात कोण नेता असेल, यासाठी बहुमत चाचणी नसते. सभागृहातल्या बहुमताचं नेतृत्व कोण करेल, हा राज्यपालांचा मुद्दाच नाही. तो पक्षांतर्गत निर्णयाचा मुद्दा आहे. जर सभागृहातलं बहुमत हलताना दिसलं, तरच बहुमत चाचणीचा विचार होऊ शकतो - सरन्यायाधीश चंद्रचूड

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635903636571303936

12:53 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis:

बहुमत चाचणी सरकारविरोधात नव्हती, तर मुख्यमंत्र्यांविरोधातील अविश्वासासाठी होती - तुषार मेहता

12:51 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis:

पक्षात मतभेद होते. ते आधीच सरकारमध्ये होते. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की एकनाथ शिंदे विधिमंडळ गटाचे नेते म्हणून कायम राहतील. ही बाब बहुमत चाचणीसाठी कारण कशी ठरू शकते? - सरन्यायाधीश चंद्रचूड

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635904040998686721

12:40 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: राज्यपालांनी कशाच्या आधारावर बहुमत चाचणीचे आदेश दिले? - सरन्यायाधीश

३४ आमदारांनी त्यांचे मतभेद स्पष्ट केले. त्यामुळे तीन पक्षांच्या सरकारचं बहुमत खाली आलं होतं. पण त्याचा परिणाम काय झाला? राज्यपालांनी त्यांना शिवसेनेचेच सदस्य म्हणून गृहीत धरायला हवं होतं. मग जर ते शिवसेवेच्या ५६ सदस्यांपैकीच असतील तर मग बहुमत चाचणीचा प्रश्न कुठे येतो? कशाच्या आधारावर राज्यपालांनी बहुमत चाचणीचे निर्देश दिले? - सरन्यायाधीशांचा तुषार मेहतांना सवाल

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635900653917863937

12:37 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: राज्यपालांचा बहुमत चाचणीचा निर्णय योग्यच - मेहता

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याऐवजी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले. जर आमदारांनी पक्षाच्या आदेशांविरोधात मतदान केलं, तर दहाव्या परिशिष्टानुसार जी काय कारवाई व्हायची ती होईल. पण आधी राष्ट्रपती राजवटीचं टोकाचं पाऊल उचलण्याऐवजी बहुमत चाचणी घ्यायला हवी. राज्यपालांनी या प्रकरणात हेच केलं - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635898457096589312

12:36 (IST) 15 Mar 2023
वर्धा: पालकमंत्री फडणवीसांची तत्परता; विविध समित्यांवर साडेतिनशे कार्यकर्त्यांना सत्तेचा लाभ

पक्षाची सत्ता आली की सामान्य कार्यकर्त्यांना आनंद होतो. सत्तेचा लाभ मिळणार, अशी सुप्त भावना असते. आपल्यामार्फत जनतेची कामे मार्गी लागणार, असा भाव विविध अशासकीय समिती मिळाली की उमटतो. तेच चाणाक्ष समजल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी कदाचित ओळखले असावे.

सविस्तर वाचा

12:25 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: मग बहुमताचा प्रश्न येतोच कुठे? - सरन्याधीश

कायदेशीररीत्या स्थापन झालेलं सरकार सत्तेत आहे. राज्यपाल एखाद्या गृहीतकावर आधारीत निर्णय घेऊ शकत नाही. राज्यपालांना त्या ३४ आमदारांना शिवसेनेचे सदस्य म्हणूनच गृहीत धरावं लागेल. जर ते शिवसेनेचेच सदस्य आहेत. तर मग सभागृहात बहुमत सिद्ध करण्याचा प्रश्न येतोच कुठे? - सरन्यायाधीश चंद्रचूड

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635898457096589312

12:23 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis:

या सगळ्या घडामोडी सरकार स्थापन झाल्यानंतर महिन्याभरात घडल्या नाहीत. हे सगळं तीन वर्षांनंतर घडत होतं. त्यामुळे अचानक एक दिवस त्या ३४ जणांना वाटलं की काँग्रेस-राष्ट्रवादीशी मतभेद आहेत. असं कसं? - सरन्यायाधीश चंद्रचूड

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635895281517748224

12:15 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणताही मतभेद नव्हता - सरन्यायाधीश

राज्यपालांनी दोन गोष्टी लक्षात घेतल्या नाहीत. एक तर काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नव्हते. दोघांकडे मिळून ९७ आमदार आहेत. हाही फार मोठा गट होता. शिवसेनेच्या ५६पैकी ३४ आमदारांनी अविश्वास दर्शवला. त्यामुळे तीन पक्षांपैकी एका पक्षात मतभेद झाल्यानंतरही इतर दोन पक्ष आघाडीत कायम होते. - सरन्यायाधीश चंद्रचूड

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635894230987177984

12:08 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: तुषार मेहतांची न्यायालयात शेरोशायरी

मै चुप रहा, तो और गलतफहमिया बढी, वो भी सुना उसने जो मैने कहा नही - तुषार मेहतांची न्यायालयात शेरोशायरी

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635896606821343232

12:06 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: सर्वोच्च न्यायालयाचे तुषार मेहतांना प्रतिप्रश्न

राज्यपालांनी त्या आमदारांना विचारायला हवं होतंं की तीन वर्षं तुम्ही सुखाने संसार केला आणि अचानक एका रात्रीत काय झालं की तुम्हाला मतभेद असल्याचा साक्षात्कार कसा झाला? - सरन्यायाधीश

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635892450001838081

12:04 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: सरकार नेहमी बहुमतात असणं गरजेचं असतं - मेहता

सरकार नेहमी बहुमतात असणं गरजेचं असतं. पण आमदारांच्या पत्रामुळे सरकारकडे बहुमत नाही हे स्पष्ट झालं. कदाचित राज्यपालांच्या निर्देशांमुळे विरोधात असणारे ३४ आमदार ४० झाले असते. पण लोकशाही असंच काम करते. - तुषार मेहता

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635891680992952321

12:03 (IST) 15 Mar 2023
डोंबिवलीतील आयरे हरितपट्ट्याला कोपर पश्चिमेतून चोरुन पाणीपुरवठा; बेकायदा वाहिन्यांमुळे रेल्वे रूळाला धोका निर्माण होण्याची भीती

कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील बेकायदा चाळी, इमारतींना कोपर पश्चिमेतील पालिकेच्या मुख्य जलवाहिनीला छिद्र पाडून २५० हून अधिक जलवाहिन्यांच्या माध्यमातून चोरुन पाणी पुरवठा केला जात आहे.

सविस्तर वाचा

12:03 (IST) 15 Mar 2023
नागपूर: ओबीसींचे वसतिगृह व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठीच! गैरव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांना प्रवेश नसल्याने रोष

ओबीसी समाजाच्या रेट्यानंतर राज्य सरकारने ओबीसी, व्हीजेएनटी आणि विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी जिल्हानिहाय वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही वसतिगृहे केवळ व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी असतील, अशी अट घालण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

11:59 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: आम्हाला याची काळजी वाटतेय - सरन्यायाधीश

महाराष्ट्र हे एक राजकीयदृष्ट्या सुसंस्कृत राज्य आहे. अशा प्रकारच्या गोष्टींमुळे राज्याला कलंक लागत आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणून आम्हाला या सर्व गोष्टींची काळजी वाटते - सरन्यायाधीश चंद्रचूड

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635890595939123200

11:55 (IST) 15 Mar 2023
Maharashtra Political crisis: राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात का? - सरन्यायाधीश

पक्षातल्या एका गटाला नेतृत्वाशी मतभेद आहेत, तर मग अस्तित्वात असलेल्या सरकारला राज्य सरकार बहुमत चाचणीचे निर्देश देऊ शकतात का?

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635889220375154688

11:52 (IST) 15 Mar 2023
Supreme Court Hearing: फक्त त्या आधारावर राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश देऊ शकतात? - सरन्यायाधीश

राज्यपालांना असं वाटलं की शिवसेनेतील एका गटाला पक्षाच्या आघाडीसोबत जाण्याच्या निर्णयावर विरोध आहे. मग फक्त त्या आधारावर राज्यपाल बहुमत चाचणीचे निर्देश देऊ शकतात का? मग एका अर्थाने ते पक्षच तोडत आहेत - सरन्यायाधीश

https://twitter.com/LiveLawIndia/status/1635889036765310976

Maharashtra Live GIF

महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Marathi News Live Updates: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर