मुंबई : देश- विदेशातील गुंतवणूकदारांना राज्यात गुंतवणुकीकरिता आकर्षित करण्यासाठी नव्या सरकारने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी ‘कंट्री डेस्क’ या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याच्या सूचना फडणवीस यांनी उद्याोग विभागास दिल्या होत्या. त्यानुसार देश- विदेशातील गुंतवणूकदारांच्या प्रस्तावांसाठी, त्यांना सल्ला व मदत देण्यासाठी कंट्री डेस्क या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवीन गुंतवणुकीसाठी जागतिक व प्रादेशिक गुंतवणूक व्यापारासह सुसंगत धोरण तयार करण्यावर भर दिला जाणार आहे.

India turmeric export target of 1 billion doller by 2030
हळदीचे १०० कोटी डॉलरचे निर्यातलक्ष्य
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
selection process for next chief election commissioner
अन्वयार्थ : सरकारी खातेच जणू…
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Chief Minister Devendra Fadnavis announcement regarding land registration Mumbai news
कोणत्याही कार्यालयातून दस्तनोंदणीची मुभा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री

हेही वाचा : Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”

राज्य सरकार व प्रमुख उद्याोग गटांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने औद्याोगिक समन्वय सुधारणा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती उद्याोग विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गुंतवणूक वाढविण्यासाठी…

● राज्यात प्राधान्याने गुंतवणूक व्हावी यासाठी संभाव्य गुंतवणूकदारांसोबत संवाद प्रस्थापित करण्यात येत आहे. याद्वारे गुंतवणुकीच्या दृष्टीने सातत्याने सहकार्य देण्यात येईल.

● आजपर्यंत झालेल्या सामंजस्य करारांची अंमलबजावणी जलद गतीने करण्यात येईल.

● महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. याअंतर्गत बहुपक्षीय संस्थांशी आणि विकास बँकांशी सहकार्य वाढवणे, दूतावास व व्यापार संघटनांशी समन्वय वाढवणे, महाराष्ट्रातील मराठी प्रवासी समुदायाला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे आणि इलेक्ट्रॉनिक्स, कापड, ऑटोमोबाईल आणि औषधनिर्मिती अशा विविध क्षेत्रांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.

हेही वाचा : बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन महायुतीत जुंपली

● या नव्या योजनांच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळ, मैत्री कक्ष व उद्याोग संचालनालय सक्रिय भूमिका बजावणार असून त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात येणार आहे.

Story img Loader