Maharashtra Politics Crisis Updates, 12 January 2023 : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) छापेमारी केली. कोल्हापूरमधील कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीने धाड टाकली. या छापेमारीनंतर राज्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तसेच, देश, विदेश आणि महाराष्ट्रातील विविध शहरांतील घडामोडी आपण जाणून घेणार आहोत…
Mumbai Maharashtra News Live Updates : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर
उरण : जेएनपीए बंदरावर आधारित – एसईझेडमधील नोकर भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना सामावून घेण्यासाठी जेएनपीएने सेझमधील उद्योगावर आधारित प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी गुरुवारी जेएनपीए कामगार वसाहतीच्या सभागृहात आयोजित सेझ जागर मेळाव्यात केली. यामध्ये महत्वाच्या पदावर भूमिपूत्र रुजू होतील, अशा पद्धतीच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याचा आग्रह धरण्यात आला.
पुणे : मावळमधील चांदखेड येथे अविनाश गोठे या आरोपीने यात्रेत गोळीबार करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या शिरगाव पोलीस ठाण्यात आरोपी अविनाश गोठेसह पाच जणांवर हत्येचा प्रयत्न आणि आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाबाबतील शिक्षक परिषदेचे उमेदवार व या मतदारसंघातील विद्यमान आमदार नागो गाणार यांनी गुरुवारी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने गाणार यांना पाठींबा जाहीर केला आहे, मात्र त्यांच्यासोबत अर्ज भरताना भाजपचा एकही बडा नेता उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे शिक्षक मतदारसंघात भाजपच लढणार अशी चर्चा होती, मात्र पक्षाने बुधवारी गाणार यांना पाठिंबा दिला.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरजितसिंग पुरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या जाहीर सभा घेऊन लोकसभा प्रवास तथा मिशन १४४ अभियानाची सुरुवात केली आहे. एकप्रकारे भाजपने प्रचाराचा नारळ फोडला आहे.
पुणे : लोहमार्गावरून धावणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेवर गंमत म्हणून फेकलेल्या दगडाचा घाव एका तेरा वर्षे वयाच्या मुलाच्या जिव्हारी लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. पण, रेल्वे प्रशासनाच्या तात्काळ हालचालींमुळे उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. आरोपी पाच तासांत पकडण्यात आला. गाडीवर दगड फेकणाराही एक अल्पवयीन मुलगाच होता.
गेल्या तीन दिवसांत दोन अल्पवयीन मुलांसह चौघे जण नायलॉन मांजामुळे गंभीररित्या जखमी झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईचा झपाटा सुरू केला. पारडी आणि सदर पोलिसांनी लगेच कारवाई करीत नायलॉन मांजा जप्त केला. विक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
पुणे : भारतात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर वर्षभर सायबर सुरक्षिततेबाबत जागृती करण्यासाठी ‘ऑनलाइन सुरक्षित राहा’ (स्टे सेफ ऑनलाइन) मोहीम राबवण्यात येणार आहे. या अनुषंगाने उच्च शिक्षण संस्थांमध्येही सायबर सुरक्षेबाबत उपक्रम करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) दिले.
जुनी पेन्शन योजना शासन देणार नाही. कारण दिल्यास राज्य दिवाळखोरीत निघेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केले. जुनी पेन्शन योजना दिल्यास राज्यावर १ लाख १० हजार कोटींचा बोजा पडेल व राज्य दिवाळखोरीत निघेल. त्यामुळे शासन जुनी पेन्शन देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपचा पराभव केला. आता नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेनेला जागा सोडली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
पुणे : कारगिल युद्धात सतरा हजार फुटांवरील टायगर हिल या बर्फाच्छादित टेकडीवर अठरा गोळ्या शरीरावर झेलून रक्तबंबाळ झाल्यानंतरही विजयश्री खेचून आणणारे परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर योगेंद्रसिंह यादव यांच्या तोंडून कारगिल युद्धाची गोष्ट ऐकण्याचा रोमहर्षक अनुभव नागरिकांनी घेतला.
महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या नागपूर विभागीय शिक्षक मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट)ला जागा सोडण्याची सहमती झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश इटकीलवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला. यामुळे महाविकास विकास आघाडीत उमेदवारीवरून एकवाक्यता नसल्याचे दिसून येते.
मध्य मुंबईतील वरळी, ना. म. जोशी आणि नायगाव येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासा विरोधात केलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. त्यामुळे बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नाशिक – महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अमलबजावणीसाठी आपले सरकार केंद्र, सेतू अथवा महा ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रांची लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक येथील आयुक्त चित्रा कुलकर्णी पाहणी करत आहेत. या भेटीदरम्यान निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील एका केंद्रावर उत्पन्न आणि जात प्रमाणपत्रासाठी ५०० ते ७०० रुपये घेतले जात असल्याची नोंद आढळली.
कल्याण पूर्वेतील मलंगगड परिसरातील काकडवाल गावात बुधवारी दुपारी दुधकर कुटुंबीयांनी महावितरणच्या वीज चोरी शोध पथकावर प्राणघातक हल्ला करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत दोन अधिकाऱ्यांचे ओठ फुटले आहेत. दात पडले आहेत. महिला कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
पुणे : बंदी घातलेल्या नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. लोहियानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सोहेल आरीफ शेख (रा. इनामकेमळा, लोहीयानगर) याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या अधिसभेवर राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली असून यात भाजप व संघ परिवाराशी संबंधित व्यक्तींना संधी देण्यात आली आहे. यातील दोन सदस्य विद्यापीठ क्षेत्राबाहेरील असल्याने शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
पुणे : परवाना असणाऱ्या वितरकांनाच नियमाप्रमाणे मद्य विक्री करता येते. तसेच, परवाना असलेल्या ठिकाणीच ग्राहकांना मद्य सेवन करता येते. मात्र, अवैध मद्यविक्री आणि अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्या २९ जणांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे.
पोलिसांचा वचक संपल्यामुळे नागपुरात गुन्हेगारांनी तोंड वर काढले आहे. पोलिसांचा धाकच उरला नसल्यामुळे नागपुरात गुंडाराज सुरु झाले असून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात दर दुसऱ्या दिवशी एक हत्याकांड घडत असल्याने उपराधानीतील नागरिक वेगळ्याच दशहतीत जगत आहे.
कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी कोळसा घेऊन जाणारी मालगाडी गुरुवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास नागपूरजवळील कळमना रेल्वे स्थानकाजवळ घरसली. यामुळे नागपूर ते हावडा मार्गावरील रेल्वेगाड्या सुरक्षिततेची उपायोजना म्हणून काही मिनिटांसाठी ठिकाठिकाणी थांबवून ठेवण्यात आल्या.
पुणे : कारागृहातील बंदीजनांमध्ये अनेक सुप्त कलागुण असतात. बंद्यांना त्यांचे कलागुण, छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होत असते. अशा कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ई मार्केटप्लसवर नागरिकांना खरेदी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे अपर पोलीस महासंचालक व कारागृह व सुधारसेवाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.
वनपरिक्षेत्र कोठारी अंतर्गत येत असलेल्या उपवनक्षेत्र करंजीमधील बोरगाव येथे एका शेतात वीजप्रवाह सोडून चार जणांनी चितळाची शिकार केली. पण मांसाची विल्हेवाट लावताना चौघेही वनविभागाच्या जाळ्यात अडकले. यांच्याकडून चितळाचे मांस व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पुणे : कर्करोगावरील उपचार कमीत कमी वेदनादायी आणि सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध व्हावा यासाठी भारतीय डॉक्टरने हाती घेतलेल्या एका संशोधनाची दखल जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकांकडून घेण्यात आली आहे. डॉ. विजय कनुरू यांनी नॅनो कर्क्युमीनच्या वापरातून तोंडाच्या कर्करोगावर औषध विकसित केले असून, वैद्यकीय संशोधनातून त्याबाबत हाती लागलेले निष्कर्षही समाधानकारक आहेत.
यवतमाळवरून ट्रक (क्र.एमएच २७-एक्स ७२००) अमरावतीकडे जात होता. नेरवरून यवतमाळकडे येणारी कार (क्र. एमएच ०६-एएन ५९८२) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. ट्रक वेगात होता, वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. अपघातात कार संपूर्णपणे क्षतिग्रस्त झाली.
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हाळुंगे-माण नगररचना योजनेस (टाऊन प्लॅनिंग – टीपी स्किम) राज्य सरकारकडून नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. मुळा आणि मुठा नदीची पूररेषा निश्चित करून नव्याने फेररचना करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती गुलदस्त्यात असली, तरी या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी युतीबाबत जास्त न ताणता भूमिका जाहीर करावी, असे ते म्हणाले. सविस्तर वाचा
कल्याण पूर्वेतील मलंगगड परिसरातील काकडवाल गावात बुधवारी दुपारी दुधकर कुटुंबीयांनी महावितरणच्या वीज चोरी शोध पथकावर प्राणघातक हल्ला करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत दोन अधिकाऱ्यांचे ओठ फुटले आहेत. दात पडले आहेत. महिला कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपचे सेवन केल्यामुळे तब्बल १९ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे ही घटना घडली, असा दावा करण्यात येत होता. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने या कंपनीचे दोन कफ सिरप लहान मुलांना देऊ नये, असे आवाहन केले आहे. वाचा सविस्तर
नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथील खाडी किनारी एक मृतदेह आढळला होता. अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील हा मृतदेह कांदळवनात अडकलेल्या अवस्थेत होता. तो बाहेर काढण्यात आला असून त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
गिरीश महाजन यांच्या विधानावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. कोणीही क्रेडिट घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला कोणाचीही फूस नव्हती. आम्हाला कोणीही भूलवलेलं नाही. आम्ही आमच्या मनाने बंड केले, असे संजय गायकवाड म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते. वाचा सविस्तर
अजित पवार यांच्या विधानानंतर त्यांनी कणकवली येथे वाहनांवर ‘धर्मवीर संभाजी महाराज’ असे लिहिलेले स्टिकर्स लावण्याची मोहीम हाती घेतली होती. हाच मुद्दा घेऊन ते राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यावरही टीका करत आहेत. त्यांनी बुधवारी (११ जानेवारी) वर्धा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना अमोल कोल्हे यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. वाचा सविस्तर
तब्बल ५२ वर्षांनी ही सवंगडी मंडळी एकत्र जमली. कुणी मुंबईतच, कुणी मुंबई बाहेर, तर कुणी चक्क परदेशात वास्तव्यास आहेत. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरनिरळ्या व्यवसायात, नोकरीत रमलेल्या या मित्र-मैत्रिणीनींनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र भेटण्याचा निर्णय घेतला आणि मानसी कीर्तिकर, मोहन बेडेकर, विश्वास पेंडसे आणि प्रकाश पिंपुटकर कामाला लागले.
प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आले होते. दरम्यान, या भेटीबाबत खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्येक भेटीत राजकीय विषय नसतो, असे आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे गटासोबतच्या युतीवरही भाष्य केले आहे. ते आज (१२ जानेवारी) मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. वाचा सविस्तर
पुणे : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांच्या गर्दीमुळे नाट्यगृहात बसण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे, मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना नाट्यगृहातील मोकळ्या जागेत भिंतीजवळ उभे रहावे लागले असल्याच्या घटनेची चर्चा झाली असताना वसंत मोरे यांनी ‘मला नीट मांडी घालून बसता येते’ अशा आशयाची पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टची चर्चाही समाजमाध्यमातून सुरू झाली आहे.
या महामार्गावर भारतीय वन्यजीव संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या मदतीने उपशमन योजना आखण्यात आल्या. त्यासाठी वनखाते, स्वयंसेवी यांची समिती गठीत करण्यात आली, पण प्रत्यक्षात या सर्व प्रक्रियेत गांभीर्याचा अभाव असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. बुधवारी भरधाव वाहनाने हिंगणानजीकच्या समृद्धी महामार्गावर रानडुकरांचा कळप चिरडला गेला.
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. बुधवारी रात्री जवळपास अडीच तास या दोघांमध्ये खलबतं सुरू होती, अशी माहिती आहे. या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सविस्तर वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास्थानी बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती गुलदस्त्यात असली, तरी या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत वंचित बहुजन आघाडी प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी एबीपी माझाशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वाचा
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. बुधवारी रात्री जवळपास अडीत तास या दोघांमध्ये खलबंत सुरू होती. या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या भेटीबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझा या वृत्तावाहिनी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या शिक्षकेतर पदांच्या भरती प्रक्रियेत बनावट उमेदवार परीक्षेस बसणे, परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर होणे, याबाबतच्या तक्रारी ठोस पुराव्यांअभावी सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण या संदर्भात चौकशी करणाऱ्या समितीने नोंदविले आहे.
उल्कापातामुळे निर्मित लोणार विवर हे जसे जागतिक आश्चर्य आहे, तसेच या विवराच्या तळाशी निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर हेही एक आश्चर्य आहे. या पाण्याचा पीएच हा १०.५ इतका जास्त असल्याने शेवाळवर्गीय वनस्पती वगळता यात कोणताही सजीव प्राणी जगण्याची शक्यता नव्हती.
मालेगाव : अजमेर येथून एका खासगी प्रवासी बसमधून मालेगावात आणण्यात येणारा प्राणघातक शस्त्रांचा साठा पोलिसांनी जप्त केला असून, या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.
एका अज्ञात इसमाने सोमवारी दुपारी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत दूरध्वनी करून शाळेत टाइम बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. काही तासांनंतर अज्ञात इसमाने शाळेच्या प्रवेशद्वारावर दुसरा दूरध्वनी केला होता. अज्ञात इसमाने केलेल्या दूरध्वनीनंतर सुरक्षा यंत्रणा आणि शाळा प्रशासनाची तारांबळ उडाली.
महापालिकेच्या आयुक्तांच्या खुर्चीवर हक्क कुणाचा, याचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडला आहे. याबाबतचा निर्णय बुधवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) होणार होता. मात्र, न्यायाधीशांना अपघात झाल्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली असून, आता १३ जानेवारीला दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे.
उत्तर मुंबई परिसरातील धोकादायक बनलेली तब्बल १०० वर्षे जुनी दुमजली इमारत रहिवासी, पादचारी आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन जमीनदोस्त करण्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे. या इमारतीमधील १७ रहिवासी आणि १४ व्यावसायिक गाळेधारकांना लवकरच इमारत रिकामी करावी लागणार आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक उद्योग गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी सरकारविरोधाता आवाज उचलला होता. महाराष्ट्रातून गेलेली गुंतवणूक हा चर्चेचा विषय बनला. त्यानंतर आता १६ जानेवारी पासून दावोस येथे आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद होत आहे. या परिषदेला देशातील सर्वच राज्यांचे प्रमुख गुंतवणूक आणण्यासाठी जात आहेत. १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दावोसचा दौरा अर्ध्यात सोडून येणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरुन शिंदे – फडणवीस हे राज्यात गुंतवणूक आणण्याबाबत गंभीर नाहीत, अशी बोचरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना केली.
संघटनात्मक पातळीवर फारशी फाटाफूट झाली नाही. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ही स्थिती राज्यातील सत्ताधारी शिंदे गटाला अस्वस्थ करणारी होती. या स्थितीत मनपातील माजी विरोधी पक्षनेते बोरस्ते आणि शिवसेनेशी कायमच एकनिष्ठ राहिलेले माजी नगरसेवक लवटे यांच्या नेतृत्वाखाली १२ माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश करीत ठाकरे गटाला धक्का दिला होता. त्यानंतर ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटाकडे ओघ सुरु झाला.
वाकोला येथे टेम्पो आणि दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याच्या सोबत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत. वाकोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौक येथील विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर गुरूवारी पहाटे हा अपघात झाला.
वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटात युतीच्या चर्चा सुरू असतानाच वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. बुधवारी रात्री जवळपास अडीच तास या दोघांमध्ये खलबतं सुरू होती, अशी माहिती आहे. या भेटीमुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
गुंतवणूक आणण्यासाठी गुजरात जाणार दावोसला, शिंदे-फडणवीस मात्र मुंबईतच मोदींच्या स्वागताला; संजय राऊतांची टीका