Marathi News, 16 June 2025 महाराष्ट्रासह राज्यभरात जोरदार पाऊस पडतो आहे. मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाल्याची माहिती ANI दिली आहे. तर दुसरीकडे मुंबईतली लोकल वाहतूक १० ते १५ मिनिटांनी उशिराने सुरु आहे. वसई-विरार भागात रविवारी संध्याकाळपासूनच जोरदार पाऊस चालू असून शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. परिणामी वाहतूक व्यवस्था व जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांनी जी भेट घेतली त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. तर कुंडमळा येथील पूल कोसळला आहे. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या बातम्या आणि राजकीय बातम्यांसह महत्त्वाच्या घडामोडींवर नजर असणार आहे ती म्हणजे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.
Maharashtra Breaking News Live Today मुंबईसह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी, यासह महत्त्वाच्या बातम्या
शालेय प्रवेश स्वागतात उत्साह, विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांवर अधिक ताण
इगतपुरीत आदिवासी क्रीडा प्रबोधिनीसाठी जागा निश्चित करावी - मंत्री डाॅ. अशोक उईके यांची सूचना
बिऱ्हाड मोर्चाची नाशिकच्या वेशीजवळ धडक - मंत्र्यांचा मध्यस्थीचा प्रयत्न
मान्सून उद्या राज्य व्यापणार, पण पेरणीची घाई नको…
मोसमी पावसाचे वारे मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी खात्याने ‘रेड अलर्ट’ देखील दिला आहे. मात्र, विदर्भात तसेच मराठवाड्यात या आठवड्यात पावसाचा जोर तितका अपेक्षीत नाही. तर पूर्व विदर्भात पाऊस एकंदरीत चांगला झालेला नाही. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी ज्यांच्या भागात अद्यापही चांगला पाऊस पडलेला नाही, त्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, असा सल्ला युकेतील नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक सायन्स येथील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी दिला आहे.
राज्य शासनातील सगळेच मंत्री समृद्धी महामार्गाबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. परंतु या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खूद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे. त्यात बिहार, उत्तर प्रदेशांतर आता महाराष्ट्रातही या घटनेबाबत गंभीर टीका करण्यात आली आहे.
बिऱ्हाड मोर्चाची वाहतूक कोंडीत भर, दहाव्या मैलावरील समस्या
मंत्री गुलाबराव पाटील यांचा असाही उत्साह, विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून शाळेपर्यंत सोडले
"…हा तर माझा गेम करण्याचा भाजपचा डाव", बच्चू कडूंचा पलटवार; म्हणाले "कारवाई सूडबुद्धीतून"
सटाणा बाह्यवळण रस्त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल - ‘राष्ट्रीय महामार्ग’कडून शिष्टमंडळास आश्वासन
एक कोटींहून अधिकचे सोने चोरणारे जेरबंद, कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांवर आता ग्रामीण पोलिसांचे लक्ष
सलग दुसऱ्या दिवशीही वसईत पावसाचा जोर कायम, सखल भाग पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत
विजय देवरकोंडाचं नाव ऐकताच लाजली रश्मिका मंदाना, अभिनेत्याबद्दल म्हणाली, "त्याच्याकडून…"
दौंड पुणे डेमूच्या डब्यात आग; आरपीएफच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात भाजप नेत्यांच्या सहभागाने खळबळ; एकाला अटक तर अन्य…
मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आमदाराने काढले नागपूरच्या स्वच्छतेचे वाभाडे
मुंबईत बेस्ट बसचा अपघात, बस गेली खड्ड्यात
मुंबईतल्या गिरगावात बेस्ट बसचा अपघात झाला आहे. गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ हा अपघात झाला असून बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली आहे. हा खड्डा पावसामुळे झाला आहे. बसचा मागचा टायर या रस्ता खचून झालेल्या खड्ड्यात अडकला आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. बस रिकामी करण्यात आली आहे.

Video : लोणावळा पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; भुशी धरण ओव्हरफ्लो
लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण्याच्या पायऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.
कोकण व उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने मुंबई शहर व उपनगरांमध्ये रिमझिम सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईला यलो अर्ट दिला असून कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरीला रेड अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टी देखील होऊ शकते असं हवामान विभागने म्हटलं आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, आहिल्यानगर व जळगाव या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर झाला आहे. तर धुळे व नंदूरबारमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
दक्षिण मुंबईतही पावसाचा जोर
दक्षिण मुंबईत पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे. नरिमन पॉईंटवर ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. पावसाची संततधार आणि वाऱ्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्यातून मार्ग काढताना बंद पडत आहे. ज्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पाऊस (file photo)
मुंबईसह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी आहे. तसंच लोकल सेवाही काही प्रमाणात उशिराने सुरु आहे. मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.