Maharashtra Political New Live Updates, 13 November 2025: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे, यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपंचायती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचा आज चौथा दिवस आहे, तरीही राज्यातील अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यांवर मतभेद दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राज्यातील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया.
Mumbai Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील विविध घडामोडींचा लाईव्ह आढावा
घारापुरी बेटाच्या पोटातील रहस्ये उलगडणार! पुरातत्त्व विभागाकडून उत्खनन
“माझा घातपात करण्याचा कट चेष्टेचा विषय नाही, मुख्यमंत्र्यांनी यात गांभीर्याने लक्ष घालावे”: मनोज जरांगे पाटील
माझा घातपात करण्याचा रचलेला कट चेष्टेचा विषय नाही. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीत ते पत्रकारांशी बोलत होते. माझ्या घातपात कटप्रकरणात बीडचा कांचन साळवी आरोपी नसल्यास तो ४-५ दिवस फरार का होता? असा सवाल जरांगेंनी केला आहे.
या कटप्रकरणी धनंजय मुंडेची चौकशी झाली पाहिजे, कारण हा कट त्यांनीच रचला आहे, असा दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अजित पवार, तुम्ही धनंजय मुंडेवर पांघरूण घालणे थांबवा; अन्यथा २०२९ ला मी तुम्हाला महागात पडेन, असा इशाराही दिला आहे. तसेच, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना चौकशीला पाठवावं, असं म्हणत धनंजय मुंडे, तुम्ही लपू नका; नार्को टेस्टसाठी अर्ज करा आणि टेस्टला हजर राहा, असेही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
बसमध्ये ‘हाथ सफाई’ करणारा गजाआड; १० पेक्षा अधिक गुन्ह्यांची उकल
‘डिजिटल अरेस्ट’ गुन्ह्यात बॅंक व्यवस्थापकाचा सहभाग… केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अटक
अतिरिक्त सत्र न्यायाधीशाविरोधात लाचप्रकरणी गुन्हा…, न्यायालयातील लिपिकाला १५ लाखांची लाच घेताना अटक
इमारतीवरून सळई पडून तरूणाचा मृत्यू; मरोळ येथील घटना
२००५ सालच्या दादरमधील जमावाने केलेल्या हिंसेचे प्रकरण : खासदार रवींद्र वायकरांसह इतर निर्दोष
अतिक्रमणकर्त्यांचे राष्ट्रीय उद्यानानजीकही पुनर्वसन नको; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावले
आता ‘धर्मवीर’ नाही, तर ‘गुवाहाटी फाईल्स’… निर्माते मंगेश देसाई काय म्हणाले..
अवजड वाहतुकीमुळे घोडबंदर कोंडले, वाहनांच्या रांगा
ठाणे, घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवा प्रयोग, अवजड वाहतुकीसाठी असणार स्वतंत्र पिवळी मार्गिका
अमली पदार्थांच्या टोळीला दणका… दोघांना १५ वर्षांच्या कारवासाची शिक्षा
Mango Season : यावर्षी आंबा हंगाम एक ते दोन महिने लांबणीवर पडणार? बदलत्या हवामानाचा आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका
“मला योग्य वाटेल ते करेन”, अंजली दमानिया यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया
पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव समोर आल्यानंतर अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, “माझ्या सदसद्विवेकबुद्धीला अनुसरून मला जे योग्य वाटेल ते मी करेन.”
