Maharashtra Latest News Updates, 30 January 2023 : काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची बंडखोरी, त्यातून काँग्रेसवर आलेली नामुष्की, भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेला आयात करावे लागलेले उमेदवार अशा अनेक घडामोडींमुळे चर्चेत आलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघांमध्ये आज सोमवारी मतदान होत आहे. पाचही जागांवर यंदा चुरशीची लढाई आहे. सध्या महाविकास आघाडीचे संख्याबळ तीन, तर भाजपचे दोन असे आहे. महाविकास आघाडी आपले संख्याबळ कायम राखणार की भाजप मुसंडी मारणार याची उत्सुकता या निवडणुकीत आहे.
तर मुंबईमध्ये २९ जानेवारी रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. हा विषयही दिवसभर चर्चे राहण्याची शक्यता आहे.
Marathi News Updates : पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे? कागदपत्रे सादर करण्याची मुदत आज संपुष्टात
सनातन धर्म हाच खरा मानवता धर्म आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदू समाजाने एकवटले पाहिजे. गोद्री महाकुंभाच्या माध्यमातून गोर बंजारा, लबाना, नायकडा व इतर पोटजातींचे एकत्रीकरण होईल.
पिंपरीतील सेवा विकास बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी यांच्या निवासस्थानावर सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकल्यानंतर मूलचंदानी यांनी तपासात असहकार्य तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. तपासात असहकार्य तसेच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अमर साधूराम मूलचंदानी यांच्यासह अशोक साधुराम मूलचंदानी, मनोहर साधुराम मूलचंदानी, दया अशोक मूलचंदानी, साधना मूलचंदानी, सागर मनोहर मूलचंदानी (सर्व रा. मिस्ट्री पॅलेस, तपोवन मंदिराजवळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वाचा…
मुंबई नाशिक महामार्गावरील मानकोली भागात लुटमार करताना तीन चोरट्यांनी एकावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची धूम सुरू असताना जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतमध्ये राजकीय भूकंप झाला. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या १२ पैकी तब्बल ८ सदस्यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर विश्वास दर्शवत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला.
लाखोंच्या संख्येतील पदविधरांची नोंदणी संदर्भात आणि मतदार असताना मतदानासाठी असलेली निष्क्रियता या निराशाजनक पार्श्वभूमीवर येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाने वेदनांची तमा न बाळगता मतदानाचा हक्क बजावला.प्रशांत कुळकर्णी असे या मतदाराचे नाव आहे.
लाखोंच्या संख्येतील पदविधरांची नोंदणी संदर्भात आणि मतदार असताना मतदानासाठी असलेली निष्क्रियता या निराशाजनक पार्श्वभूमीवर येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाने वेदनांची तमा न बाळगता मतदानाचा हक्क बजावला.प्रशांत कुळकर्णी असे या मतदाराचे नाव आहे.
न्नई येथे आयोजित बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठातर्फे गेलेल्या खेळाडू विद्यार्थिनींसोबत प्रशिक्षक व व्यवस्थापकाने मद्यधुंद अवस्थेत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींनी तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.
पाणीपुरी खाल्यानंतर पैसे मागितल्याने दोन गुंडांनी पाणीपुरी विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारवाडा परिसरात घडली. राजेंद्रसिंग दयाराम जाठम (वय २२, रा. मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्या पाणीपुरी विक्रेत्याचे नाव आहे.
रेल्वे मार्गात देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आली आहेत, हे माहिती असुनही भिवंडी जवळील ज्युचंद्र ते चंद्रापाडा गाव रस्त्या दरम्यानच्या रेल्वे फाटकात गुरुवारी रात्री दीड वाजता सात प्रवाशांनी फाटक उघडण्यासाठी गोंधळ घातला. रेल्वे फाटक नियंत्रकाला शिवीगाळ केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर 'शिवसेना' पक्षानाव आणि 'धनुष्यबाण' चिन्ह यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सुरू असून यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी आज अखेरचा दिवस होता. त्यानुसार ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील १५ ते १६ माजी नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देऊन त्यापैकी ठाणे आणि कळवा भागातील पाच माजी नगरसेवक थेट बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.
संगीतकार नंदू घाणेकर यांचे सोमवारी हृदयवविकाराच्या झटक्याने सकाळी नऊ वाजता निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी मुलुंड येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आईच्या वार्धक्याचा गैरफायदा घेऊन वडिलांनी कमाविलेले ५५ लाख, साेन्याचे दागिने तसेच सदनिकेची परस्पर विक्री करून दोन कोटी ४७ लाख ७१ हजार रुपयांच्या मालमत्तेचा अपहार केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने बहिणीसह तिच्या मुलांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी उषा गुल मनसुखानी, जय गुल मनसुखानी, भावना गुल मनसुखानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील मन नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. ७ वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि ९ वर्षीय दानियाल मोहम्मद फैय्याज असे या दोन्ही मृत मुलांची नावे आहेत.
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारत प्रकरणामुळे खडबडून जागे झालेल्या कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामे करणाऱ्या भूमाफियांची बांधकामे जमीनदोस्त करणे, त्यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना नियोजन (एमआरटीपी) कायद्याने गु्न्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीसाठी आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यातील संथ गतीनंतर दुसऱ्या टप्प्यात मात्र मतदानाची गती वाढल्याचे दिसून आले.
अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीसाठी आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यातील संथ गतीनंतर दुसऱ्या टप्प्यात मात्र मतदानाची गती वाढल्याचे दिसून आले.
मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये सहा ते नऊ महिन्यांच्या बालकांचा गोवरने मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे यापुढे सहा ते नऊ महिन्यांच्या बालंकाच्या लसीकरणावर भर देत याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली.
मुंबई : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पात अतिरिक्त चटईक्षेत्रफळापोटी ५० टक्के सवलत मिळविणाऱ्या विकासकांनी म्हाडाला अदा करावयाच्या विकास शुल्काबाबत मात्र हात आखडता घेतला आहे. ही रक्कम माफ करता येणार नाही, अशी भूमिका उच्च न्यायालयाने घेतल्यानंतर विकासकांची पंचाईत झाली आहे.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदारांचा उत्स्फूर्त पतिसाद मिळताना दिसून येत आहे. सावरकर नगर चौकातीलजुपिटर हायस्कूल मतदानासाठी मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.
वाई : सातारा लोणंद रस्त्यावर शिवथर गावच्या हद्दीत कांद्याने भरलेला ट्रक अवघड वळणावर रात्री पलटी झाला. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी कांदा व्यवसायिकाचे मोठे नुकसान झाले.
विधानपरिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सकाळी १० पर्यंत १३.५७ टक्के मतदान झाले आहेआज गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७.०० वा. पासून तर अन्य पाच जिल्ह्यांमध्ये ८.०० वा. पासून मतदानास सुरुवात झाली आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी आल्या होत्या. त्यावेळी वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्यात कोयता गँग असेल तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. तसेच महिलांना धमकीण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता यामध्ये गृह मंत्रालयाचे अपयश असून, त्यामुळे ‘गृहमंत्री जवाब दो’ या राज्यात काय चाललंय, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
केंद्र सरकारने ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांगांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून जामनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण सुद्धा घेतले. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने (Air Pressure) विमानाला परत माघारी यावे लागले, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. मात्र, सकाळच्या सत्रात मतदानाची गती संथ असल्याचे चित्र आहे. सकाळी १० वाजेपर्यंत ५.४९ टक्के मतदानाची नोंद झाली.
सात महिने होत आले तरी राज्यातील १८ मंत्रीच राज्याचा कारभार करत आहेत. हे मंत्री योग्य निर्णय घेऊ शकत नसल्याने सर्वत्र अनागोंदीची परिस्थिती आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री शिंदे सरकारने केला तर शिंदे यांच्या पक्षातील, भाजपमधील सर्वच आमदार, नेते मंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत. या सर्वांना मंत्री मंडळात सामावून घेणे शक्य नाही. हा शिंदे गट आणि भाजपमधील असंतोष टाळण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर टाकला जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रविवारी येथे केली.
कसारा, कर्जत हून कल्याणकडे सकाळी येणाऱ्या लोकलना सोमवारी रेल्वे मार्गावरील दाट धुक्याच्या चादरीचा फटका बसला. त्यामुळे या रेल्वे मार्गावरील लोकल सेवा पाच ते १० मिनिटे उशिराने धावत होती.
नागपूर : नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक केल्याप्रकरणी सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. कळमना ते कामठीदरम्यान गाडीवर रविवारी दगडफेक झाली होती.
पैसे देण्यास नकार देणाऱ्या वृद्ध आईचा मुलाने विळ्याने गळा चिरून खून केला. ही थरारक घटना रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास वनदेवीनगरात घडली.
निवडणुकीत रिंगणात असलेले राजकीय पक्षाचे उमेदवार एकमेकांचा चेहराही पाहत नाहीत. परस्परांना भेटतही नाहीत. मात्र जेव्हा निवडणूक शिक्षकांची असते तेव्हा उमेदवार असले तरी त्यांच्यातला शिक्षक जागा असतो आणि असेच एक चित्र आज शहरातील मोहता सायन्स कॉलेजच्या मतदान केंद्रावर पाहायला मिळाले.
नागपूर : तो त्यांचाच अधिवास होता, पण माणसांनी त्यावर आक्रमण केले. त्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही आणि परिणामी अधिसुची एक मधील (पूर्णपणे संरक्षित प्रजाती) तब्बल १२ काळविटांना सोलापूर-पुणे-मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावर जीव गमवावा लागला. रविवारची संध्याकाळ त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरली.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात सोमवार सकाळी आठ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांचा समवेश असलेल्या शिक्षक मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. तेथील नक्षलवांद्यांच्या हालचाली लक्षात घेता प्रशासन काळजीत असते. मात्र ‘शिक्षक’च्या निवडणुकीत मतदानासाठी मोठ्या संख्येने शिक्षक बाहेर पडू लागले असून गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ ते ९ या दोन तासात १२.८६ टक्के मतदान झाले आहे.
सातारा पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन ठार, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी ३० जानेवारीला सकाळी आठ वाजतापासून १२४ मतदान केंद्रावर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून सहा जिल्ह्यातील ३९ हजारावर शिक्षक मतदार त्यांचा विधान परिषदेतील प्रतिनिधी या माध्यमातून निवडणार आहे.
भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले यांच्याशी केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या विधानाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.
सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीला मानखुर्द पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. याप्रकारणी मुलीने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
बहुजन समाजामध्ये काही वर्ग असा आहे ज्याचा हिंदूंच्या विचारांवर विश्वास आहे. त्यांना हा धर्म सर्वसमावेशक वाटतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे ओळखून आहेत. त्यामुळे यांच्या भरवशावर ते हिंदू राष्ट्र बनवण्याची स्वप्न पाहत आहेत.
नागपुरातील एका मोठ्या कोळसा व्यापाऱ्याला चौघांनी केंद्रीय कोळसा मंत्र्यांच्या नावावर १ कोटीच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास वृत्तपत्राच्या माध्यमातून बदनामी करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातील तीन तोतया पत्रकारांसह चौघांना अटक केली.
जी २० शिखर परिषदेच्या तयारीसाठी मुंबई महापालिकेने युद्धपातळीवर रस्त्यांची डागडुजी केली त्याला तब्बल १० कोटींचा खर्च आला आहे. सांताक्रूझ परिसरापासून विमानतळाकडे जाणाऱ्या पाच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी हा खर्च करण्यात आला आहे.
दहिसर ते मीरारोड-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेतील राई-मुर्धा-मोर्वा येथील प्रस्तावित कारशेडला स्थानिकांनी विरोध केला असतानाही येथील ३२ हेक्टर जागेवर कारशेडसाठी आरक्षण प्रस्तावित आहे. त्यावर नागरिकांनी मोठ्या संख्येने सूचना-हरकती सादर केल्या असून त्यावर मंगळवारपासून (आजपासून) सुनावणी होणार आहे.
अमेरिका–चीन व्यापारयुद्ध आणि कोरोना नंतरच्या काळात बदललेल्या जागतिक रचनेचा परिणाम म्हणून चीनमधून अनेक कंपन्या बाहेर पडल्या. Google, Adidas, Samsung व्हिएतनामला, Hyundai, Honda अमेरिकेत, JVC Kenwood, Iris Ohyama जपानला, Murata थायलंडला, Harley Davidson मलेशियाला गेली. या कंपन्यांना भारत सर्वात जवळचा पर्याय असूनही त्या भारतात आल्या नाहीत. कारण त्यासाठी पूरक वातावरणही असावं लागतं, पण यातच आपण कमी पडलो, अशी टीका रोहित पवार यांनी मोदी सरकारवर केली आहे. आजच्या बेरोजगारीच्या काळात अशा कंपन्या देशात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1619900118681133057?s=20&t=sH81r-hHPThK3G6hS9u59Q
विधानपरिषेदच्या पाच जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचही मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे. अशातच अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा
जगातील सातव्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अदाणी यांच्या उद्योगसमूहावर ‘हिंडेनबर्ग’ने गंभीर आरोप केले आहेत. अदानीप्रवर्तीत उद्योगसमूहाने दशकांपासून ताळेबंदात आणि लेखांमध्ये गैरप्रकार केल्याचं अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार संस्था ‘हिंडेनबर्ग’च्या आपल्या एका अहवालात म्हटलं आहे. ‘हिंडेनबर्ग’च्या अहवालानंतर अदानी समूहाला ४.२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अशातच अदानी समूहाने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर वाचा
मुंबईमध्ये २९ जानेवारी रोजी हिंदू जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना भवनाच्या परिसरातच हा मोर्चा काढण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं या मोर्चेकऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोर्चा काढणाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच, यावरून संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाच टोला लगावला आहे. सविस्तर वाचा
काँग्रेसचे सत्यजित तांबे यांची बंडखोरी, त्यातून काँग्रेसवर आलेली नामुष्की, भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेला आयात करावे लागलेले उमेदवार अशा अनेक घडामोडींमुळे चर्चेत आलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर अशा पाच मतदारसंघांमध्ये आज, सोमवारी मतदान होत आहे. प्रथमच चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. सविस्तर वाचा
दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणाऱ्या बागेश्वर धामचे वादग्रस्त धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर विविध स्तरातून टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या विधानावरून संताप व्यक्त केला आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज जिथे दिसेल तिथे ठोकून काढा, असं ते म्हणाले. अकोल्यात टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा
खरी शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, या मुद्दय़ावर केंद्रीय निवडणूक आयोगापुढे कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी सोमवारी अखेरची मुदत आहे. त्यानंतर दोन-चार दिवसांत आयोगाचा निर्णय अपेक्षित आहे.