Maharashtra Political News, Weather Update Today नव्या संसद भवनाचं उद्घाटन थाटामाटात पार पडलं आहे. मात्र हा लहरी राजाचा सोहळा होता. महाल बांधण्यासाठी १ हजार कोटी खर्च करण्यात आला असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सदनातून अहिल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवण्यात आले आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र यावरुन विरोधक आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. तर महाविकास आघाडीचा उमेदवार तोच असेल ज्याच्यात जिंकण्याची क्षमता असेल असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. पुणे लोकसभेच्या निवडणुकीविषयी हे ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. या सगळ्या घडामोडींसह महत्त्वाच्या घडामोडींवर आपली नजर असणार आहे.