Maharashtra Latest Marathi News: करोना रूपी संकट दूर झाल्यानंतर दोन वर्षांनी राज्यात काल ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात गणरायाचे आगमन झाले. नागरिकांनी मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचे स्वागत केले. त्यानंतर आज राज्यात अनेक ठिकाणी दीड दिवसांच्या गणरायाल निरोप देखील दिला जाणार आहे. याशिवाय, काल गणरायाच्या आगमनासोबतच वरूण राजाने देखील पुनरागमन केले होते. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. दुसरीकडे राज्यातील राजकीय रणधुमाळी सुरूच आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते विविध मुद्य्यांवरून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. सणासुदीचा काळ सुरू असताना विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. पाहूया याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…