Mumbai Breaking News : महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात अनेक नेत्यांच्या सभा आणि दौरे सुरू आहेत. यातच मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून भाजपा आणि शिंदे सेनेमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. असं असताना भाजपाचे नेते गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे नवी मुंबईचं राजकारण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक पोलीस परेड मैदान येथे शासकीय ध्वजवंदन सोहळा झाला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करत असताना आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेतल्याचा आरोप करत एक महिला कर्मचारी संतप्त झाली. यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
Maharashtra Marathi News : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
गायिका अंजली भारतींचं अमृता फडणवीसांबाबत निंदनीय विधान; संजय राऊत म्हणतात, “अमृताजी…”
Anjali Bharti Statement on Amruta Fadnavis: गेल्या काही महिन्यांत राजकारणात एकमेकांवर टीका करण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर घसरल्याची तक्रार सामान्य मतदार अनेकदा करताना दिसतात. वेळोवेळी सत्ताधारी व विरोधी पक्षातली काही नेतेमंडळी ही तक्रार योग्य असल्याचंच सिद्ध करणारी विधानं करताना दिसतात. पण दुसरीकडे इतर समाजघटकांकडूनदेखील आता टीका करताना पातळी सोडली जात असल्याचं वास्तव समोर येऊ लागलं आहे. याचंच एक उदाहरण म्हणजे भीमगीते गाणाऱ्या गायिका अंजली भारती. अंजली भारतीचा यासंदर्भातला भंडाऱ्यातल्या भीम मेळाव्यातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे.
मिरा-भाईंदरमधील 'त्या' उड्डाणपुलाच्या निर्मितीत कोणतीही चूक नाही, एमएमआरडीएचे स्पष्टीकरण
सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक; दोन सराईत आरोपीना अटक
बोईसर : सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करीत दागिने लांबवून महिलेची फसवणूक करणाऱ्या दोन सराईत चोरांना बोईसर पोलिसांनी अटक केली आहे.
बोईसर मधील हंसीदेवी कुंदनसिंह रोतेला ही महिला १३ जानेवारी रोजी भाजी बाजारातून भाजी खरेदी करून परतत असताना आयसीआयसीआय बँकेजवळ दोन अनोळखी इसमांनी तिच्याशी ओळख निर्माण केली. आपण सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो अशी बतावणी करीत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी आणि हातातील सोन्याच्या बांगड्या पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून साडे तीन लाख रुपये किमतीचे ४५ ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच महिलेने याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे धीरज उर्फ पापा राजाराम राठोड आणि दिनेश सोलंकी या दोन सराईत चोरांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्या विरोधात मुंबई परिसरात चोरीचे आणखी चार गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
Pimpri Chinchwad: ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात मानावरून दोन गटात राडा, उपसरपंच महिलेच्या पतीसह १५ जणांविरोधात गुन्हा
सिन्नर मधील शाळांमध्ये आता सीसीटीव्ही आणि तक्रारपेटी अनिवार्य, मुख्यध्यापकांना कडक सुचना
जेएनपीए सेझमध्ये २६ टक्क्यांनी वाढ; आयात- निर्यातीमध्येही भरघोस वाढ
'महिलांविरोधातील वक्तव्यांना...', अंजली भारती यांच्या वक्तव्यावरून नवनीत राणांचा इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत गायिका अंजली भारती यांनी वादग्रस्त विधान केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. गायिका अंजली भारती यांच्या वक्तव्याचा नवनीत राणा यांनी निषेध व्यक्त केला. 'महिलांविरोधातील अशा वक्तव्यांना थारा देता कामा नये', असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
मुंबई ते नवी मुंबई विमानतळ जोडण्यासाठी मेट्रो ८ मार्गाला मान्यता; मंत्रीमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय वाचा!
मुंबईला नवी मुंबईशी जोडण्याकरता मेट्रो ८ ला मान्यता देण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसंच, समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामास गती देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
घोडागाडीच्या अपघातात तरुणी गंभीररित्या जखमी, केळवे समुद्रकिनाऱ्यावरील प्रकार, मुंबईत खाजगी उपचार सुरू
फलाटावर सापडलेली ‘शिवानी’; आई-वडिलांचा शोध सुरू
Mira-Bhayandar News :मिरा रोड येथे नव्या सिमेंट रस्त्याची तोडफोड, निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी प्रशासनाची कारवाई
बँक कर्मचाऱ्यांचा आज देशव्यापी संप, बँकिंग सेवा विस्कळीत
"सरकारी धोरणांचा निषेध आणि प्रलंबित मागण्यांसाठी आज देशातील लाखो बँक कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. बँक कर्मचाऱ्यांच्या कामाचा आठवडा पाच दिवसाचा करण्यात यावा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण थांबवावे, रिक्त पदे तातडीने भरावीत आणि वेतन करारात सुधारणा करावी, या मुख्य मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे आज चेक क्लिअरन्स, रोख रक्कम काढणे आणि नवीन खाते उघडणे यांसारख्या सेवांवर मोठा परिणाम झाला आहे", अशी माहिती एका बँक कर्मचाऱ्याने दिली आहे.
Girish Mahajan : '…तर राजीनाम्याची मागणी का?', नाशिकच्या घटनेवरून गिरीश महाजनांचं पुन्हा स्पष्टीकरण
ॲड.आंबेडकर, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी, भाजपच्या ‘शहर सुधार’कडे बहुमत
कल्याणमधील ठाकरे गटाच्या बेपत्ता नगरसेवकांचा नाशिक, इगतपुरी, सिन्नर परिसरात शोध
भंडाऱ्यात सैराट ! आंतरजातीय विवाहातून तरुणाची हत्या; सासू आणि साळ्यासह तीन जणांना अटक
Maharashtra Weather Update : येत्या २४ तासांत मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मुंबई परिसरात हवामानात लक्षणीय बदल
मिरा-भाईंदरमध्ये विरोधकांची 'शहर विकास आघाडी' २०२९ च्या विधानसभेची तयारी
Buldhana crime update : वाडी येथे दरोडा, प्रतिकार करणारे बाप लेक, गंभीर जखमी
Gold Silver Price: सोने, चांदीच्या दरात आणखी मोठा उलटफेर… जळगावमध्ये ग्राहक चक्रावले!
Nandurbar: २१ कोटींची शासकीय माॅडेल डिग्री काॅलेजची इमारत धूळ खात… नंदुरबारमध्ये तीन वर्षांपासून वापराविना पडून !
Girish Mahajan: गिरीश महाजन यांच्या विरोधात ॲट्राॅसिटी कायद्यान्वये गुन्हा….ॲड. प्रकाश आंबेडकर मैदानात !
‘महारेरा’मध्ये कधीही तक्रार दाखल करण्याची मुभा!‘महारेरात तक्रार दाखल करण्यासाठी कालमर्यादा नाही!’, अपिलीय न्यायाधिकरणाची स्पष्टोक्ती
"अंजली भारती यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत चुकीचं...", रोहित पवारांनी काय म्हटलं?
"गायिका अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसंदर्भात केलेलं वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व हीन दर्जाचं आहे. राज्यात महिला सुरक्षा-महिला सबलीकरण महत्त्वाचे आहेच, शक्ती कायद्याची गरज आहेच यात शंका नाही, पण महिला सुरक्षेवर बोलताना थेट दुसऱ्या एका महिलेसंदर्भात बलात्काराची भाषा वापरणं नक्कीच माणूस म्हणून देखील शोभणारं नाही. त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध", असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
"मुंब्र्याला हिरवं करून टाकू " सहर शेख च्या वक्तव्याला गणेश नाईकांचा पाठिंबा…? काय म्हणाले नाईक..
Nashik Ringroad : नाशिक सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनात कोणावर अन्याय होत असेल तर….खासदार राजाभाऊ वाजे स्थानिकांसाठी आक्रमक
Rain In Mumbai: मुंबई आणि उपनगरात पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ कुठे ?
‘पनवेलच्या महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात?’
सहर शेख प्रकरणानंतर आज मुंब्र्यात जितेंद्र आव्हाड यांची रॅली, आव्हाड सभेत काय उत्तर देणार?

“एखादं नाव घ्यायचं राहिलं तर गोंधळ का घालायचा?”, बाबासाहेबांचं नाव विसरल्याप्रकरणी गिरीश महाजनांची प्रतिक्रिया; दिलगीरीही केली व्यक्त, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
