Maharashtra Political Update Today :पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात करतात पण ते कधीही जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देत नाहीत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसंच राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसंच महापालिकांच्या निवडणुका घ्यायला सरकार का घाबरतं आहे? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे. दुसरीकडे राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली ती अजून समोर आलेली नाही. राहुल गांधी जे अमेरिकेत बोलले त्याचे पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आहे. राज्यातले नेते राहुल गांधींवर टीका करु शकतात. तसंच काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं मंगळवारी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासह महाराष्ट्रातल्या सर्व घडामोडी जाणून घ्या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून