Maharashtra Political Crisis Updates, 15 November 2022 : राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय दंड विधानातील ३५४ कलमांतर्गत त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावे लिहिले आहे. वसईतील एका २६ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. आरोपी प्रियकराने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे. दरम्यान पोलीस चौकशीत आरोपीने तिचा गळा दाबणं सोपं होतं, पण मृतदेहाची विल्हेवाट लावणं फार कठीण होतं असं म्हटलं आहे. वाचा राज्यभरातील विविध घडामोडी एकाच क्लिकवर