Shiv Sena Symbol Case Supreme Court Hearing Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार? की ते कोणाला मिळणार या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
- आमदार अपात्रता याचिका: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. घटनेच्या १० व्या अनुसूचीनुसार शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी दिलेला नकार, या याचिकेद्वारे आव्हानात आणला गेला आहे.
- विशेष न्यायपीठ: या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या न्यायपीठासमोर होत आहे.
- पक्ष आणि चिन्हाचा वाद: यासोबतच, एकनाथ शिंदे गटाला अधिकृत ‘शिवसेना’ म्हणून मान्यता देण्याच्या आणि पक्षचिन्ह वाटप करण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्णयाला आव्हान देणारी याचिकादेखील सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी २ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.
Shiv Sena Symbol Case Supreme Court Hearing Live Updates | शिवसेना पक्ष, धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू...
VIDEO: CJP संस्थापक अभिजित दिपके यांची महत्त्वाची घोषणा! NEET आंदोलनानंतर मोर्चा आता E20 कडे...
नाशिकमध्ये सुनेत्रा पवार प्रकरणावर राजकीय संघर्ष; काँग्रेस कार्यालयाकडे मोर्चा, तणाव
राहुल नार्वेकरांचा निर्णय अवैध; संपूर्ण सरकारची निर्मितीच बेकायदेशीर
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ पक्षाला मुख्य पक्ष मानून दिलेला निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अध्यक्षांनी अपात्रतेच्या याचिकांवर वेळेत निर्णय न घेतल्याने १० व्या अनुसूचीचा मूळ उद्देशच नष्ट झाला असून, या बेकायदेशीर सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केल्याचा आरोप सिब्बल यांनी केला.
निवडणूक चिन्ह हे मूळ राजकीय पक्षाचेच; विधिमंडळ पक्षाचे नाही; न्यायालयाच्या प्रश्नावर ठाकरे गटाचे स्पष्टीकरण
सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश व न्यायमूर्तींनी "निवडणूक चिन्ह कुणाचे?" असा प्रश्न विचारला. त्यावर सिब्बल यांनी स्पष्ट केले की, चिन्ह हे राजकीय पक्षाचे असते, विधिमंडळ पक्षाचे नाही. राजकीय पक्षाच्या मान्यतेशिवाय कुणालाही उमेदवारी किंवा चिन्ह मिळत नाही.
शिंदेंचे कृत्य पक्षविरोधी; १० व्या अनुसूचीनुसार आमदार अपात्र
कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले की, सूरत आणि गुवाहाटीला गेलेले आमदार भाजपच्या संपर्कात होते आणि शिंदे यांनी 'महाशक्ती' पाठीशी असल्याचे जाहीर केले होते. हे कृत्य उघडपणे पक्षविरोधी असून, पक्षांतरबंदी कायद्यानुसार (१० वी अनुसूची) हे सर्व आमदार आपोआप अपात्र ठरतात.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयांवर तीव्र आक्षेप
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला बेकायदेशीर ठरवत सिब्बल यांनी अध्यक्षांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण केले:
शिवसेनेच्या या महत्त्वाच्या वादावर सर्वोच्च न्यायालय आता काय भूमिका घेते आणि पक्षांतरबंदी कायद्याचा नवा अर्थ कसा लावते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
"विधिमंडळातील पक्षापेक्षा राजकीय पक्ष श्रेष्ठच!", सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वाची टिप्पणी
शिवसेनेच्या नाव आणि पक्षाच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महत्त्वाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. "राजकीय पक्षाचे नियंत्रण हे नेहमी विधिमंडळ पक्षावरच असते," असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्षाच्या अधिकारांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
न्यायालयाने नमूद केले की, राजकीय पक्षाने घेतलेला कोणताही वैध निर्णय हा विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या इच्छेपेक्षा नेहमीच वरचढ ठरेल. म्हणजेच, केवळ लोकप्रतिनिधी किंवा आमदारांचे बहुमत आहे म्हणून राजकीय पक्षाची मूळ भूमिका किंवा निर्णय बाजूला सारता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
'१० व्या अनुसूचीचा उद्देशच संपला'
कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निकालाचा संदर्भ देत अध्यक्षांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
"आम्ही मोठ्या संघर्षांनंतर न्यायालयाकडून अध्यक्ष हे एक 'लवाद' असल्याचा आदेश मिळवला होता. तरीही घटनापीठाच्या निकालानंतर २०२३ मध्ये नोटिसांना उत्तरे दाखल केली गेली."
कायद्याच्या औचित्यावरच प्रश्न: "जेव्हा लवाद किंवा अध्यक्ष निर्णयच न घेण्याची भूमिका घेतात, तेव्हा संविधानातील १० व्या अनुसूचीचा (पक्षांतर बंदी कायदा) नेमका अर्थ आणि उद्देश काय उरतो?"
महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना सिब्बल म्हणाले की, या सर्व प्रकरणात लोकशाहीची तत्त्वे पायदळी तुडवली गेली आहेत. बेकायदेशीर पायावर उभे राहिलेले सरकार कोणताही कायदेशीर अडथळा न येता आपला पूर्ण कार्यकाळ चालवते, ही बाब संविधानाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. या प्रकरणातील कायदेशीर पेच आणि सर्वोच्च न्यायालयाची आगामी भूमिका याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
'सरकारचा पायाच बेकायदेशीर, तरीही कार्यकाळ पूर्ण केला!'
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा तीव्र युक्तिवाद पाहायला मिळाला. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर आणि तत्कालीन सरकारच्या वैधतेवर अत्यंत आक्रमक शब्दांत बोट ठेवले. "ज्या सरकारचा पायाच पूर्णपणे बेकायदेशीर होता, त्या सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला," असा घणाघाती आरोप सिब्बल यांनी न्यायालयात केला.
कपिल सिब्बल यांचा राहुल नार्वेकरांवर जोरदार हल्लाबोल; राहुल नार्वेकरांच्या निर्णयांवर थेट प्रश्न
न्यायालयात युक्तिवाद करताना कपिल सिब्बल म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी तर भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून तात्काळ मान्यता दिली.
"कोणत्याही लवादाला किंवा प्राधिकरणाला ठराविक प्रक्रिया आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन करावे लागते. मात्र, या प्रकरणात मूलभूत नियमांकडेच दुर्लक्ष करण्यात आले." - कपिल सिब्बल, ज्येष्ठ वकील
पक्षातील 'बहुमत' कसं ठरवायचं? सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
राजकीय पक्ष, निवडणूक चिन्ह आणि पक्षांतर्गत बहुमत या कायदेशीर मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाचा आणि युक्तिवाद सुरु आहे. सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती बागची यांच्यात झालेला युक्तिवाद राजकीय पक्षाचे अस्तित्व आणि निवडणूक आयोगाच्या (ECI) अधिकारांवर थेट प्रकाश टाकणारा ठरला.
'पक्षाचे पत्र नाही तर उमेदवारी नाही' – कपिल सिब्बल
पक्षाच्या अधिकाराचे समर्थन करताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडली.
चिन्हाची मान्यता: निवडणूक आयोग पक्षाच्या चिन्हाला मान्यता देतो. मी माझ्या पसंतीचे चिन्ह निवडू शकतो, पण जोपर्यंत मूळ पक्ष अधिकृत पत्र (B-Form) देत नाही, तोपर्यंत कोणालाही उमेदवारी अर्ज भरता येत नाही.
घटनात्मक अस्तित्व: जर इथे पक्षाची घटनाच अस्तित्वात नाही असा युक्तिवाद केला जात असेल, तर २०१३ च्या निवडणुकांवरही प्रश्न उपस्थित होतील आणि पक्षाचे अस्तित्वच उरणार नाही.
विधिमंडळ पक्ष की मूळ राजकीय पक्ष? निवडणूक आयोगाचा प्रश्न चुकीचा: न्यायमूर्ती बागची
सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर मोठे निरीक्षण नोंदवले. "निवडणूक आयोगाने विधिमंडळ पक्षात बहुमत आहे की नाही, हा प्रश्न विचारून गफलत केली. वास्तविक पाहता हा संपूर्ण विषय मूळ 'राजकीय पक्षाशी' संबंधित असायला हवा," असे न्यायमूर्ती बागची यांनी स्पष्ट केले. तसेच, कोणत्याही पक्षाची व्याख्या कशी करायची आणि बहुमताचा अर्थ कसा लावायचा, हे पक्षाची स्वतःची घटनाच ठरवते, असा पुनरुच्चारही त्यांनी केला.
'आमदारांचे कृत्य पक्षाचे सदस्यत्व सोडण्यासारखेच', सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. "२२ जूनच्या बैठकीला गैरहजर राहून आमदारांनी प्रतोद सुनील प्रभूंचे अधिकार नाकारले. तसेंच आमदार महेश शिंदे यांच्या स्वाक्षरीतही मोठी तफावत होती," असे सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावर "आमदार पक्षाच्या मूळ नेतृत्वाला पदावरून हटवू शकत नाहीत," अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली.या टिप्पणीचा धागा पकडत सिब्बल म्हणाले, "आमदारांचे हे वर्तन म्हणजे स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडण्यासारखेच आहे. याच पूर्वनियोजित कटातून राज्यात सत्तांतर घडवून आणले गेले, ज्याचे देशाच्या लोकशाहीवर गंभीर परिणाम होत आहेत."
मुख्य प्रतोद बदल प्रकरण: कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तीवाद सुरु...
विशेष न्यायपीठ
या प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या न्यायपीठासमोर होत आहे.
आमदार अपात्रता याचिका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. घटनेच्या १० व्या अनुसूचीनुसार शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्यास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी दिलेला नकार, या याचिकेद्वारे आव्हानात आणला गेला आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवणार? की ते कोणाला मिळणार या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
नांदेडे यांच्या पदव्यांची ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडर्स’मध्ये नोंद!
द्रोणागिरीत अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी; बेकायदा वाहनतळांमुळे अपघाताचा धोका
पाणथळींच्या सीमांकनानंतरच विकास; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने नवी मुंबईतील निर्णयप्रक्रियेला नवी दिशा
‘पिंक ई-रिक्षा’साठी अडथळ्यांचीच वाट; महिलांकडून प्रतिसाद का नाही?
संसदेत विधेयक सादर; व्यापाऱ्यांवर ‘एमडीआर’चा भार आणणारे संसदेत विधेयक; यूपीआय व्यवहारांवर आता पैसे मोजावे लागणार?
पोलिसांनी जप्त केलेला टेम्पो पोलीस ठाण्याच्या आवारातूनच चोरीला; अहिल्यानगरमधील घटना
E20 पेट्रोल वाद: नितीन गडकरींविरोधात 'डीपफेक' व्हिडिओ बनवणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका! सर्व सामग्री तातडीने हटवण्याचे निर्देश
सोने, चांदीच्या दरात घसरणीनंतर पुन्हा तेजी..! जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत आता काय स्थिती?
आनंदवार्ता ! नाशिक जिल्ह्यात नोकरीची सुवर्णसंधी, १२०० पेक्षा अधिक जागा उपलब्ध
अहिल्यानगरमध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी पथक; सात महिन्यात १.७८ कोटींचे अमली पदार्थ जप्त
International Mathematical Compitition : भारतीय विद्यार्थ्यांनी सोडवले आंतरराष्ट्रीय गणित… आंतरराष्ट्रीय गणित स्पर्धेत दमदार कामगिरी!

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स| महाराष्ट्र मान्सून अपडेट्स
