Maharashtra News Live Update, 13 May: किरकोळ किमतींवर आधारित महागाई दराने सरलेल्या एप्रिलमध्ये ७.७९ टक्के हा आठ वर्षांतील उच्चांकी स्तर नोंदवला आहे. तर दुसरीकडे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची वाट सुकर झाली असून, दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याशिवाय राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरेंवर टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तसंच औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यानाही मोठा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे नवाब मलिकांना कोर्टाने दिलासा दिला असून खासगी रुग्णालयात उपचारास परवानगी दिली आहे. पण अनिल देशमुखांना मात्र कोर्टाने झटका दिला आहे. अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.