Mumbai Breaking News Live Today : अमित शाह असतील किंवा इतर नेते असतील यांनी त्यांचा पक्ष वाढवला नाही. महाराष्ट्रात भाजपा वाढवण्याचं काम गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला. देश स्तरावर लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी वाढवला. आता जे आहे ती या पक्षाची सूज आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसंच भाजपाबरोबर राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत असंही म्हटलं आहे. आज बारावीचा निकाल आहे. या निकालात पुन्हा मुलीच बाजी मारणार का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. यासह सगळ्याच घडामोडींवर आपली लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असेल.

Live Updates

Mumbai-Pune News Live Today 05 May 2025 : "भाजपासह राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत", संजय राऊत यांचं वक्तव्य, यासह इतर महत्त्वाच्या बातम्या

17:22 (IST) 5 May 2025

विभागात नाशिक अग्रस्थानी, मागील वर्षाच्या तुलनेत घसरण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत घेण्यात आली. सोमवारी या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला. ...अधिक वाचा
17:10 (IST) 5 May 2025

ए आर रहमान संगीत रजनीला ५००० किलो कचऱ्याचा ढीग; नवी मुंबई महापालिकेकडून डी.वाय.पाटील स्टेडियम परिसर स्वच्छ 

स्टेडियमवर कार्यक्रमासाठी होणारी गर्दी लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनखाली विविध उपाययोजना आखण्यात आल्या होत्या ...सविस्तर बातमी
15:43 (IST) 5 May 2025

Maharashtra HSC 12th Result 2025 : बारावीचा निकाल यंदा का घटला?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९१.८८ टक्के निकाल लागला. ...सविस्तर बातमी
15:38 (IST) 5 May 2025

अजित पवारांना दिलेल्या निवेदनात आयुक्तालयाची मागणी शेवटच्या स्थानी, खतगावकर समर्थकांनी घेतली मुंबईमध्ये भेट

खतगावकर, त्यांच्या स्नुषा डॉ.मीनल पाटील, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि त्यांच्या अनेक समर्थकांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. ...अधिक वाचा
12:37 (IST) 5 May 2025

राष्ट्रीय महामार्गावर कलव्हर्टच्या कामात नियोजनाचा अभाव ? ससूनवघर येथे अपुऱ्या वाहिनीमुळे वाहतूक सेवा विस्कळीत

राष्ट्रीय महामार्गावरील पावसाचे पडणारे पाणी व सांडपाणी याचा निचरा होण्यासाठी जागोजागी बॉक्स कलव्हर्ट तयार केली जात आहेत. ...वाचा सविस्तर
12:13 (IST) 5 May 2025

घोडबंदर रस्त्याच्या कामात एमएमआरडीएने दिली शासन नियमांना तिलांजली, मनसेचा आरोप

एमएमआरडीए प्राधिकरणाच्या वतीने सुमारे ५०० कोटी खर्च करून घोडबंदर रस्त्याचे मुख्य व सेवा रस्ते एकत्रितपणे काँक्रिटीकरण पद्धतीने तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
12:03 (IST) 5 May 2025

कासा : कंक्राडी नदी गटारगंगा बनली; डहाणू नगरपरिषदेचे दुर्लक्ष, सांडपाणी आणि कचऱ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त

परिसरातील अनेक रहिवासी आणि व्यापारी हे इमारती सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन न करता ते मलमूत्र मिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडत असल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. ...वाचा सविस्तर
11:58 (IST) 5 May 2025

कोकणात निघालेल्या प्रवाशांची बस उलटली; एक ठार, ३२ जखमी

कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या उतरणीवर कलंडल्यामुळे बसमधील ३२ प्रवासी जखमी झाले तर ३० वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. ...सविस्तर वाचा
11:34 (IST) 5 May 2025

महाराष्ट्राचा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची महाराष्ट्राची टक्केवारी ९१.८८ आहे.बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे.

11:23 (IST) 5 May 2025

VIDEO : हळदीच्या कार्यक्रमात बैल उधळला; वऱ्हाड्यांची पळापळ, व्हिडिओ व्हायरल

ठाणे, रायगड जिल्ह्यात हळदीच्या कार्यक्रमात खिल्लार बैल नाचविण्याची नवी प्रथा सुरू झाली आहे. या प्रथेमुळे अपघातांच्या घटना घडू लागल्या आहेत. ...वाचा सविस्तर
11:14 (IST) 5 May 2025

Video : आलीशान कार ऐवजी जेव्हा प्रताप सरनाईक रिक्षाचे स्टेअरिंग घेतात हाती

कार्यकर्त्याने नवी रिक्षा घेतल्याने त्या कार्यकर्त्याने ती रिक्षा सरनाईक यांना दाखविण्यासाठी कार्यालयाबाहेर आणली होती. परंतु रिक्षा चालविण्याचा मोह सरनाईक यांना आवरता आला नाही ...वाचा सविस्तर
10:45 (IST) 5 May 2025

‘डेली इन्कम’च्या लोभापाई २४ लाख गमावले; उल्हासनगरातील प्रकार, गुन्हा दाखल

पूर्वी घरात घुसून केली जाणारी चोरी आता लोकांच्या हातातील विश्वात अर्थात मोबाईलमध्ये घुसून केली जाते आहे. ...सविस्तर वाचा
10:30 (IST) 5 May 2025

गोंदियात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी विजेच्या कडकडासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेला अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, या आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पीक आणि मका पिक हे आता कापणीला आले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याच प्रमाणे आंबा पिकाला सुद्धा या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आलेल्या अवकाळी पावसाने गारवा निर्माण झाला आहे. मात्र, आलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे.

10:20 (IST) 5 May 2025

राज्यात १२५ वसतिगृह उभारणार; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती

बदलापूर शहरात ३ मे १९२७ रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवजयंती निमित्त हजेरी लावली होती. या भेटीचा स्मृतिदिन आणि ती शिवजयंती आजही बदलापुरात साजरी केली जाते. ...सविस्तर वाचा

Mumbai-Maharashtra News

खासदार संजय राऊत यांची भाजपावर टीका, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. आत्ताचा भाजपा म्हणजे पक्षाला आलेली सूज आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच आज बारावीचा निकालही आहे. या निकालात किती टक्के मुली बाजी मारतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.