Mumbai Breaking News Live Today : अमित शाह असतील किंवा इतर नेते असतील यांनी त्यांचा पक्ष वाढवला नाही. महाराष्ट्रात भाजपा वाढवण्याचं काम गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला. देश स्तरावर लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी वाढवला. आता जे आहे ती या पक्षाची सूज आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसंच भाजपाबरोबर राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत असंही म्हटलं आहे. आज बारावीचा निकाल आहे. या निकालात पुन्हा मुलीच बाजी मारणार का हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. यासह सगळ्याच घडामोडींवर आपली लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर असेल.
Mumbai-Pune News Live Today 05 May 2025 : "भाजपासह राहून अजित पवार कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत", संजय राऊत यांचं वक्तव्य, यासह इतर महत्त्वाच्या बातम्या
विभागात नाशिक अग्रस्थानी, मागील वर्षाच्या तुलनेत घसरण
ए आर रहमान संगीत रजनीला ५००० किलो कचऱ्याचा ढीग; नवी मुंबई महापालिकेकडून डी.वाय.पाटील स्टेडियम परिसर स्वच्छ
Maharashtra HSC 12th Result 2025 : बारावीचा निकाल यंदा का घटला?
राष्ट्रीय महामार्गावर कलव्हर्टच्या कामात नियोजनाचा अभाव ? ससूनवघर येथे अपुऱ्या वाहिनीमुळे वाहतूक सेवा विस्कळीत
घोडबंदर रस्त्याच्या कामात एमएमआरडीएने दिली शासन नियमांना तिलांजली, मनसेचा आरोप
कासा : कंक्राडी नदी गटारगंगा बनली; डहाणू नगरपरिषदेचे दुर्लक्ष, सांडपाणी आणि कचऱ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त
कोकणात निघालेल्या प्रवाशांची बस उलटली; एक ठार, ३२ जखमी
महाराष्ट्राचा बारावीचा निकाल ९१.८८ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची महाराष्ट्राची टक्केवारी ९१.८८ आहे.बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे.
VIDEO : हळदीच्या कार्यक्रमात बैल उधळला; वऱ्हाड्यांची पळापळ, व्हिडिओ व्हायरल
Video : आलीशान कार ऐवजी जेव्हा प्रताप सरनाईक रिक्षाचे स्टेअरिंग घेतात हाती
‘डेली इन्कम’च्या लोभापाई २४ लाख गमावले; उल्हासनगरातील प्रकार, गुन्हा दाखल
गोंदियात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
गोंदिया जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास अनेक ठिकाणी विजेच्या कडकडासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेला अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, या आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान पीक आणि मका पिक हे आता कापणीला आले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्याच प्रमाणे आंबा पिकाला सुद्धा या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. आलेल्या अवकाळी पावसाने गारवा निर्माण झाला आहे. मात्र, आलेल्या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहे.
राज्यात १२५ वसतिगृह उभारणार; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची माहिती
खासदार संजय राऊत यांची भाजपावर टीका, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. आत्ताचा भाजपा म्हणजे पक्षाला आलेली सूज आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच आज बारावीचा निकालही आहे. या निकालात किती टक्के मुली बाजी मारतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.