Mumbai Maharashtra Breaking News Today : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेते आपापल्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. तसेच आजपासून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर असून जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी करणार आहेत. मंत्री पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे देखील त्यांच्याबरोबर असतील. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून पवारांच्या या दौऱ्यावरही आपलं लक्ष असेल.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड न्यायालयात सुनावणी होणार आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जावरही आज निर्णय होण्याची शक्यता आहे. विष्णू चाटेच्या अर्जावरही आज निकाल येऊ शकतो. यावरही आपलं लक्ष असेल.
Mumbai Maharashtra News Live Today 19 May 2025 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी आता ३ जूनला सुनावणी; विष्णू चाटेचा अर्ज मागे, तर वाल्मीकचा कायम
प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहायकांचे आंदोलन, खरिपाच्या तयारीत अडचणी वाढण्याची चिन्हे
काँग्रेसच्या तिरंगा फेरीत शहिदांना श्रद्धांजली
ऑनलाईनमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता - दादा भुसे यांचा दावा
मधमाशी संवर्धनासाठी डहाणू, तलासरी मध्ये पोषक वातावरण, मधुक्रांतीतून शेती उत्पादन वाढवणे शक्य
सरकारी अधिकारी असल्याचे भासवून एकाची फसवणूक; अनधिकृत बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी
कल्याणच्या एस. टी. बस आगारात बसमध्ये चढताना प्रवाशाला लुटले
ठाण्यात बुधवारी पाणी पुरवठा बंद
विधान भवनाच्या प्रदेशद्वाराजवळ शॉर्ट सर्किटमुळे आगीची दुर्घटना
महाराष्ट्र विधान भवनाच्या प्रदेशद्वारावर आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील स्कॅनिंग मशीनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग विझवण्यात आली असून कोणतीही मोठी हानी झालेली नाही. स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. तसेच या घटनेनंतर शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
"हा आपल्या जवानांवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार", राहुल गांधींच्या 'त्या' प्रश्नावर एकनाथ शिंदेंची टीका
राहुल गांधी यांचा प्रश्न आपल्या जवानांवर अविश्वास दाखवणारा आहे, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ऑपरेशन सिंदूर ही मोहीम हाती घेण्याआधी सरकारने पाकिस्तानला अलर्ट का केलं? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, असा प्रश्न विचारणं म्हणजे आपल्या जवानांवर अविश्वास दाखवण्यासारखं आहे. हा आपल्या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबातचा मुद्दा आहे. देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. त्यामुळे असे प्रश्न उपस्थित करून आपल्या देशावर व आपल्या जवानांवर प्रश्न उपस्थित करणं दुर्दैवी व निंदाजनक आहे.
तिरंगा रॅलीच्या अनुषंगाने राजकीय शक्ती प्रदर्शन,शिंदे व भाजप गटाच्या वेगवेगळ्या रॅली
जाता जात नाही त्याला जात म्हणतात... , सरन्यायाधिशांच्या स्वागतास पोलीस महासंचालक, मुख्य सचिवांच्या गैरहजेरीवरून आव्हाड यांची प्रशासनावर टीका
बदलापूर कर्जत मार्ग ठरतोय कोंडीचा; रस्ते खोदलेले, बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडीत भर
कार्यालयीन सुधारणांत कुळगाव बदलापूर पालिका प्रथम, कोकण विभागीय तालुका कार्यालयांमध्ये अव्वल, मुरबाड पोलिस निरिक्षकही पहिले
ऑपरेशन सिंदूरनंतरच्या जल्लोषावर अमित ठाकरेंची खंत, पंतप्रधान मोदींना पत्र लिहित म्हणाले...
जळगाव बाह्यवळण महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
महापालिकेची निवडणूक आली... चला चला भूमिपूजनांची वेळ झाली, मनसेचे नेते राजू पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
'या' समाजाचा मुख्यमंत्र्यांना खडा सवाल, "सरकार तर आले, आमचे काय?" फुंकला बिगुल…
रायगडच्या महाडमध्ये स्नेहल जगताप यांनी रविवारी (१८ मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी आयोजित कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची नक्कल केल्याचं पाहायला मिळालं. खांद्यावर रुमाल ठेवून सर्वांसमोर हात जोडून त्यांनी उपस्थितांना नमस्कार केला. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता.
"वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी स्नेहल जगताप यांच्याशी चर्चा केली होती. तुम्ही स्नेहल यांना काय विचारलं आणि त्या वाघिणीने तुम्हाला काय उत्तर दिलं ते मला माहिती आहे. मी फार बोलत नाही. मी अधिक वेळ घेत नाही. तुम्ही सगळे जण आलात..." असं म्हणत तटकरे यांनी खांद्यावर रुमाल ठेवला, हात जोडून सर्वांना नमस्कार केला. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. त्यानंतर तटकरे सर्वांचे आभार मानून मंचावरून खाली उतरले.