राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर काँग्रेसकडूनही उमेदवार उभा केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता नव्या राष्ट्रपतींची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. विरोधकांकडूनही उमेदवार देण्यास उशीर झाल्याने भाजपा हा प्रयत्न करताना दिसत आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. मुलाला धमकीची चिठ्ठी मिळाल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरेंनी फेसबुकवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. राजकारणामध्ये काम करताना कोण कधी वैरी होतो हेच समजत नाही असं भावनिक वक्तव्य करतानाच वसंत मोरेंनी नेमकं काय घडलं आणि ही चिठ्ठी रुपेश मोरेंना कधी सापडली याबद्दलचा तपशील पोस्टमध्ये मांडलाय. महाराष्ट्राला शूरवीरांचा गौरवशाली इतिहास लाभला असून अनेक महापुरुषांनी महाराष्ट्र घडविला आहे. अशा या महाराष्ट्राचा आणि शूरवीरांचा, महापुरुषांचा, नेत्यांचा गौरवशाली इतिहास आता राज्यातील विविध पर्वतरांगांवर शिल्पाच्या रुपात मांडण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पर्वतरांगांवर इतिहास जतन करण्याची ही अनोखी संकल्पना मांडली आहे. आता ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणे तसेच सविस्तर आराखडा तयार करण्याकरिता सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. अशा विविध घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय पातळीवर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी आता एकाच ठिकाणी वाचू शकता.