सांगली : पहिली उचल ३७०० रुपयांची मागणी असताना राजारामबापू साखर कारखान्याने उसाला जाहीर केलेला ३२०० रुपयांचा पहिला हप्ता अमान्य असून याविरुध्द स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी शनिवारी दिला.

खराडे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जयसिंगपूर येथे घेण्यात आलेल्या ऊस परिषदेत पहिली उचल ३७०० रुपयांची मागणी केली आहे.सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा १०.५० आहे, तरीही त्यांनी पहिली उचल ३५०० रुपये जाहीर केली आहे. सांगली जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्याचा साखर उतारा बाराच्या पुढे आहे त्यामुळे ३७०० रुपये जाहीर करायला काहीच हरकत नाही. मात्र ती भूमिका घ्यायला जिल्ह्यातील साखर कारखानदार तयार नाहीत. गेल्या वर्षीही जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी योग्य दर दिला नाही.

Jugeshinder Singh, CFO of Adani Enterprises.
Hindenburg : “कितने गाझी आये, कितने गाझी गये”, हिंडनबर्ग बंद करण्याची घोषणा; आदाणी समूहाचा टोला
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
Mahakumbh First Amrit Snan on makar Sankranti
महाकुंभातील पहिल्या अमृतस्नानाचं महत्त्व काय? मकर संक्रांतीच्या दिवशीच याचे आयोजन का केले जाते?
jaggery house on the banks of warna river remains closed
वारणा काठावरील गुऱ्हाळघरे झाली इतिहास जमा; जाणून घ्या, वारणा काठावर नेमकं काय झाले
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
cm devendra fadnavis address party workers at bjp state convention
सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह ठरेल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे परखड मतप्रदर्शन

हेही वाचा…अवकाळीचा फटका, कोल्हापुरात उस जमीनदोस्त

गेली वर्षभर साखरेचा दरही चांगला राहिला. मात्र अनेक कारखान्यांनी पहिल्या उचलीनंतर शेवटचा हप्ता दिलेला नाही. साखरेची आधारभूत किंमत सध्या ३१ रुपये आहे. ती वाढविण्यासाठी साखर कारखानदारांनी लढण्याची भूमिका घ्यावी, त्या लढाईत आम्हीही खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहोत. साखरेची आधारभूत किंमत ३१ रुपयांवरून ३५ रुपये झाल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. मात्र साखर कारखानदार या प्रश्नावर संघर्ष करायला तयार नाहीत हे वास्तव आहे जिल्ह्यातील ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांनी प्रयत्न करून या प्रश्नी साखर कारखानदार, शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक घ्यावी आणि तोडगा काढावा किंवा कारखानदारांनी आपापली पहिली उचल जाहीर करून कोंडी फोडावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले.

Story img Loader