महांकाली सहकारी साखर कारखाना राजारामबापू कारखान्याकडे

दिगंबर शिंदे

Regional office of Agriculture and Processed Food Products Export Development Authority APEDA opened in Nagpur Mumbai print news
नागपुरात होणार ‘अपेडा’चे प्रादेशिक कार्यालय; जाणून घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसा पुढाकार घेतला
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Soybean purchase , Soybean rate,
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळूनही दर घसरणीला…
Nashik, Kumbh Mela , meeting ,
नाशिक : कुंभमेळा तयारीसाठी लवकरच स्थानिक पातळीवर बैठक, संशयास्पद भूसंपादनाची चौकशी
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
jaggery house on the banks of warna river remains closed
वारणा काठावरील गुऱ्हाळघरे झाली इतिहास जमा; जाणून घ्या, वारणा काठावर नेमकं काय झाले
Hapus season delayed , Hapus pune, pune, mango ,
पुणे : पावसामुळे हापूसचा हंगाम सुरू होण्यास विलंब, मार्केट यार्डात हंगामपूर्व हापूसची पहिली पेटी दाखल
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?

सांगली : पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीमध्ये  प्रबळ असलेल्या इस्लामपूरच्या राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात महांकाली सहकारी साखर कारखाना २५  वर्षांसाठी चालविण्यास घेण्याचा निर्णय घेतला. कारखान्याच्या वार्षिक सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीच तशी घोषणा केली आहे. जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के उस गाळप करण्याची क्षमता राजारामबापू कारखान्याकडे यापुढील काळात असणार असून जिल्ह्याच्या आर्थिक नाडय़ा आता इस्लामपूरच्या हाती राहण्याची चिन्हे आहेत.

 पलूस-कडेगाव वगळता अन्य सर्वच तालुक्यांतील साखर कारखानदारीची धोरणे आणि दिशा आता इस्लामपूरकरांच्या हाती एकवटली तर आश्चर्य वाटणार नाही अशी स्थिती आहे. सांगली जिल्ह्याचे गेल्या अर्धशतकाहून अधिक  काळ अर्थकारण कृष्णाकाठच्या ऊस पट्टय़ातच फिरत आले आहे. बारमाही वाहणाऱ्या कृष्णा-वारणा नदींच्या खोऱ्यात असलेल्या पाण्यामुळे आणि जलसिंचनाचे जाळे असलेल्या या भागातील ऊस शेतीने आर्थिक स्थैर्य दिले. मात्र, या पश्चिम भागातील सधनतेवर मिरज, तासगाव, विटा, जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या दुष्काळी भागातही राजकीय सोयीतून साखर कारखानदारी सहकाराच्या माध्यमातून उभारली. यातील मिरजेचा मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना राजारामबापूच्या पाठबळावर तग धरून राहिला. अन्य साखर कारखाने आर्थिक संकटात सापडत गेले.

Story img Loader