Manoj Jarange मराठ्यांशी बेईमानी करायची नाही, तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार आहे हे लक्षात ठेवा असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे. मराठ्यांच्या मतांशिवाय कुणी सत्तेत येऊ शकत नाही हे विसरु नका असंही मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले. तसंच शपथविधी झाला की शुभेच्छा देऊ नाहीतर त्यांचं पुन्हा काहीतरी लांबलं तर आपल्या शुभेच्छा वाया जायच्या असाही टोला जरांगेंनी ( Manoj Jarange ) लगावला.

काय म्हणाले मनोज जरांगे?

“मराठ्यांना आरक्षण द्यावंच लागेल, सत्ता आली, भरपूर बहुमत मिळालं म्हणून मराठ्यांशी बेईमानी करायची नाही. पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही. याँव करेन आणि त्याँव करेन असं चालणार नाही. मराठे कुणाच्या बापाला भीत नसतात. मराठा रस्त्यावर उतरला की तुमचं काही खरं नाही. गॅझेट लागू करायचे, मराठा आणि कुणबी एकच आहे. उगाच सत्ता आली म्हणून मस्ती येऊ द्यायची नाही. मराठे कुणाचीही मस्ती टिकू देत नाही तशीच मी पण टिकू देणार नाही.” असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Rohit Pawar On Ajit Pawar group
Rohit Pawar : अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या खासदारांना ‘ऑफर’? रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “अधिवेशन होतं तेव्हा…”
Register a case against Manoj Jarange Patil, protesters demand outside Shivajinagar police station in Pune
“मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा”, पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलकांची मागणी
sanjay raut
Sanjay Raut : “संतोष देशमुखप्रकरणी सुरेश धस पुरेसे, फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय…”, संजय राऊतांचं वक्तव्य चर्चेत!
Suresh Dhas
Suresh Dhas : “पहिली पसंती मुख्यमंत्र्यांना, अजित पवार झाले तर…”, बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सुरेश धस यांचं स्पष्ट मत

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले मनोज जरांगे?

“लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आणले कुठून? आम्ही फक्त इतके हजार कोटी आणले हेच ऐकतोय. आता अटी घातल्या आहेत असं कळतंय म्हणजे योजना बंद करायची आहे का? हे आमचेच पैसे आम्हाला घेऊन दिले आहेत. अटी कशा आहेत ते काय माहीत नाही. शेतमालाला भाव देणार नाहीत, शेतकऱ्यांना मदत करत नाहीत उलट फक्त रस्ते तयार करत आहेत.” असं मनोज जरांगे ( Manoj Jarange ) म्हणाले. तसंच समृद्धीला तर नुसती चित्रंच आहेत. कांद्याला भाव हवा, कापसाला हवा, महागाई वाढली त्यावर काय करायचं? आपण मैदानात असतो तर सूपडा साफ केला असता. मात्र आरक्षण घेणार म्हणजे घेणारच. रक्तपात करेन, हल्ले करेन हे स्वप्न सरकारने सोडून द्यावं असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे.

आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे, उपोषणाची तारीख लवकरच जाहीर करणार

आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरला होता आणि धरला आहे. उपोषणाची तारीख आम्ही जाहीर करणार नाही. त्यांचं सरकार स्थापन होऊदे त्यानंतर आम्ही तारीख जाहीर करु. सगळ्या पक्षांमध्ये आमचा मराठा समाज आहे. सगळे मिळून आरक्षणाची लढाई लढणार आहोत. सगळ्या आमदारांना मराठे बोलायला लावणारे आहेत. जर नाही बोलले तर मतदान करणारेच त्या आमदाराला जाब विचारतील. सरकार स्थापन होऊ द्या मग उपोषण आंदोलनाची तारीख जाहीर करणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader