मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. तिकडे मुंबईमध्ये छत्रपती संभाजीराजे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. तर दुसरीकडे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मराठा आरक्षणावर आघाडी सरकार गंभीर नाही. आरक्षण रद्द झाल्यानंतर सरकारने मराठा समाजाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मराठा समाजाचा वापर केवळ सत्ता मिळविण्यासाठी खतासारखा केला जात असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.”

“मराठा आरक्षणावर हे महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही. हे वारंवार स्पष्ट होताना आपल्याला दिसतय. मराठा समजाचं आरक्षण रद्द झाल्यानंतर या सरकारने एकही निर्णय, एकही गोष्ट मराठा समाजासाठी केलेली नाही, ही वस्तूस्थिती आहे.” असं विनायक मेटे म्हणाले आहेत.

Child care leave
“बालसंगोपन रजा नाकारणं म्हणजे घटनेचं उल्लंघन”, सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणावरून फटकारले!
Contempt of Babasaheb Ambedkar by Congress Amit Shah allegation
काँग्रेसकडून बाबासाहेबांचा अवमान; अमित शहा यांचा आरोप
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!

तसेच, “जे जे या चळवळीत आरक्षणासाठी आंदोलन करतात, त्या सगळ्यांबरोबर बोलणं चर्चा करणं, या देखील साध्या प्राथमिक गोष्टी हे सरकार करत नाही. मराठा यांना काही देणंघेणं नाही. फक्त सत्ता मिळवण्यासाठी खतासारखा उपयोग हे सरकार मराठा समाजाचा करतय, हे आपल्या चित्र दिसतय.” असा आरोपही विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.