scorecardresearch

Premium

साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांना अडवल्याने गोंधळ

वारकऱ्यांना टोल माफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले  असताना सुद्धा या  टोल नाक्यावर वारकऱ्यांची गाडी अडविण्यात आली.

mess at anewadi toll plaza after blocking warkari
वारकऱ्यांनी टोलनाक्यावरील वाहतूक रोखत  रस्त्यावरच भजन करण्याचा निर्णय घेतला.

वाई: पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांना सायंकाळी अडवल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण झाले. टोल वसुलीवरून वारकरी आणि टोल नाका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. वारकऱ्यांनी टोलनाक्यावरील वाहतूक रोखत  रस्त्यावरच भजन करण्याचा निर्णय घेतला.बंदोबस्ता वरील भुईंज(ता वाई) पोलिसांनी मध्यस्थी करून वाहतूक  सुरळीत केली.

हेही वाचा >>> “क्षुल्लक कारणासाठी शिवसेना-भाजपा युतीत मिठाचा खडा…” खासदार श्रीकांत शिंदे असं का म्हणाले?

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीला जाणाऱ्या कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या गाडीला आनेवाडी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांनी अडवले. कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांकडे टोलची मागणी केली. वारकऱ्यांना टोल माफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले  असताना सुद्धा या  टोल नाक्यावर वारकऱ्यांची गाडी अडविण्यात आली. वारकऱ्यांकडे टोलची मागणी करण्यात आली.  मात्र वारकरी व टोल कर्मचाऱ्यांमध्ये दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली .वारकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडून भजन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक खोळंबली. टोल नाक्यावर बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी टोल नाका कर्मचारी व वारकऱ्यांमध्ये मध्यस्थी करून केली. संत ज्ञानेश्वर माऊली च्या पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आनेवाडी टोल नाक्यावर टोलसाठी अडवण्यात आल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला.

हेही वाचा >>> सांगली: बिबट्याला वाचविण्यात वन विभागाला यश

रिलायन्सच्या रघुविर सिंह या अधिकाऱ्यांने  वारकऱ्यांच्या गाड्यांच्या टोल वसुली साठी अडवल्यामुळे गाडीतील सर्व वारकरी आंदोलनाच्या पवित्र मध्ये रस्त्यावर उतरले त्यामुळे काही वेळ टोल नाक्यावर वाहतूक अडविली. वारकरी टोल नाक्यावर भजन करण्याच्या निर्णयाप्रत येऊन साहित्य घेऊन खाली उतरले. यावेळी टोल नाक्यावर बंदोबस्तावर असणाऱ्या भुईंज (ता वाई) पोलिसांनी वादामध्ये मध्यस्थी करून गाड्या सोडून दिल्या आणि वाहतूक सुरळीत करून दिली.मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसाठी टोल मुक्त करण्याची घोषणा केली असताना साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्यावर मात्र वारकऱ्यांची टोल साठी अडवणूक होत असल्याने वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mess at anewadi toll plaza in satara after warkari stopped by toll employee zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×