काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून जात असताना ५० खोक्यांवरून शिवसेनेतील बंडखोरांवर खोचक विधान केलं. यावर आता शिंदे गटातील नेते आणि मंत्री दादाजी भुसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “५० कोटी रुपयांच्या विषयाचा चोथा झाला आहे. आता लोक हसायला लागलेत या गोष्टींना,” असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलं. ते नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

दादाजी भुसे म्हणाले, “५० कोटी रुपयांच्या विषयाचा चोथा झाला आहे. या गोष्टीला आपण किती किंमत द्यायची याचाही विचार झाला पाहिजे. या गोष्टींना लोक हसायला लागले आहेत.”

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray Balasaheb Thackeray
‘आम्ही त्यांचा आदर करु शकत नाही’, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”

“लोकांना समजते आहे की, चांगली विकासाची कामं होत आहेत, गोरगरिब जनतेच्या दृष्टिकोनातून विकासाची कामांबाबत चांगले निर्णय होत आहेत. त्यावरून दिशाभूल करण्यासाठी हा केविलवाना प्रयत्न आहे,” असं मत दादाजी भुसेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “राहुल गांधींच्या वक्तव्याने मविआत फूट पडू शकते”, राऊतांच्या विधानावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले, “सावरकरांबद्दल…”

“५० कोटींचे आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत”

“जनतेने ५० कोटी रुपयांच्या विषयाला महत्त्व दिलं असतं तर मोठ्या संख्येने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात जनता गेली असती का? राहिला विषय ५० कोटी रुपयांचा तर आरोप करणाऱ्यांनी त्याचे पुरावे द्यावेत,” असंही दादाजी भुसेंनी म्हटलं.