रत्नागिरी : मिरकरवाडा येथील बंदर मलपीपेक्षाही ५०० कोटी खर्च करुन मोठे आणि अत्याधुनिक बंदर उभे होणार आहे, त्यामुळे याला विरोध न करता येथील लोकांनी मत्स्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

रत्नागिरीतील मिरकरवाडा जेटीवर असणारी ३१९ अनधिकृत बांधकामांना पाडण्याची नोटीस मत्स्य विभागाने दिली होती. त्याची मुदत आता २६ जानेवारीला संपणार आहे. मात्र या विरोधात महिला मच्छीमारांनी मत्स्य विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत दौऱ्यावर असताना मच्छीमार लोकांनी त्यांची भेट घेतली व कारवाई स्थगित करावी अशी मागणी केली. मात्र यावेळी पालकमंत्र्यांनी या मच्छीमारांना बंदराच्या विकासाबाबत त्यांना सांगितले. या बंदर विकासाचा मच्छीमारांनाच फायदा व्हावा, बंदराचा विकास व्हावा यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे प्रयत्न करत आहेत. मात्र यात कोणताही आकस ठेवून कारवाई केली जात नाही. त्यामुळे मच्छीमारांनी आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत, मत्स्य विभाग तातडीने कारवाई करणार नाही, असे सामंत यांनी सांगितले.

Hundreds of trees in Pune are being cut down in pursuit of riverside beautification
नदीकाठ सुशोभीकरणाच्या अट्टहासातून पुण्यातील शेकडो वृक्षांची कत्तल होतेय…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Mumbai Municipal Corporations budget 2025 is tomorrow
पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना काय मिळणार? मुंबई महानगरपालिकेचा उद्या अर्थसंकल्प
ganesh temple in Sangli beautifully decorated for Ganesh Jayanti attracting huge crowd
माघी गणेश जयंतीनिमित्त सांगली गणेश मंदिरात गर्दी
plan to increase the length of the ghats for kumbh mela discussed in weekly meeting
कुंभमेळ्यासाठी घाटांची लांबी वाढविण्याची योजना; साप्ताहिक बैठकीत चर्चा
Country first semiconductor project to be completed by December print eco news
देशातील पहिला अर्धसंवाहक प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्णत्वाला
Asiatic lions arrive at Sanjay Gandhi National Park
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सिंहाचे आगमन
नाणार-बारसूतील प्रस्तावित ‘रिफायनरी’वर प्रश्नचिन्ह; कमी क्षमतेच्या प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्र्यांचे संकेत

कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे मत्स्य बंदर असल्याने मलपीपेक्षाही मोठे आणि सुसज्ज बंदर उभारले जाणार आहे. जवळपास पाचशे कोटींचा आराखडा तयार केला जात असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले.

Story img Loader