scorecardresearch

“मोरारजी देसाईंनी दिसता क्षणी गोळी…”, हुतात्मा स्मृतीदिनी मनसेनं केलेली पोस्ट चर्चेत!

मनसेनं ‘एक्स’ खात्यावर पोस्ट लिहून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील संघर्षाची आठवण करून दिली आहे.

hutatma chowk
फोटो सौजन्य-एक्स/मनसे

महाराष्ट्रात २१ नोव्हेंबर हा दिवस ‘हुतात्मा स्मृती दिन’ म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या १०७ जणांच्या स्मरणार्थ आजचा दिवस पाळला जातो. आजच्या दिवसाचं औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हुतात्म्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. यावेळी मनसेनं ‘एक्स’ खात्यावर पोस्ट लिहून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील संघर्षाची आठवण करून दिली आहे.

मनसेनं ‘एक्स’वरील (पूर्वीचे ट्विटर) पोस्टमध्ये लिहिलं, “राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला. हा निर्णय कळल्यापासून मुंबईकर नाराज होते. मुंबईतील मराठी समाजमन संतापले होते. फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. गर्दी वाढू लागली. कामगार आणि पांढरपेशांचा मोर्चा निघाला. सरकार विरोधी घोषणाबाजी सुरू झाली. फोर्ट परिसरातील जमावबंदी आणि सभाबंदी मोडून नागरिकांनी बंड पुकारले. अनेकांनी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात रस्त्यावर बसून सत्याग्रह सुरू केला. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. लाठीमार झाला तरी गर्दी हटत नाही हे बघून पोलिसांनी गोळीबार केला.”

Aditya Thackeray
राज ठाकरेंसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले? आदित्य ठाकरेंचं रोखठोक मत; म्हणाले, “रक्ताच्या…”
Chandrakant Khaire
“महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार”; ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?
sharad pawar chandrashekhar bawankule
“चंद्रशेखर बावनकुळेंचं ते वक्तव्य म्हणजे…”, शरद पवारांची सूचक टिप्पणी; म्हणाले, “जे अशी भूमिका घेतात…!”
Eknath SHinde (
Maharashtra News : आमदार अपात्रतेप्रकरणी आजच्या सुनावणीत काय घडलं? शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांनी निकाल…”

हेही वाचा –बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राडा, आदित्य ठाकरे शिंदे गटावर संतापले; “गद्दार गँग, ‘पक्षचोर’, ‘बापचोर’…”

“मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिसताक्षणी गोळ्या घाला, असा आदेश दिला. या आदेशाचे विपरित परिणाम झाले. गोळीबारात १०७ जण हुतात्मा झाले आणि वातावरण बदलले. या घटनेचा परिणाम झाला, अनेक मराठी पुढाऱ्यांनी मागणी लावून धरली, कामगारांनी-शेतकऱ्यांनी निकराची झुंज दिली. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला मंजुरी मिळाली. हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेल्या राजधानी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाने लढवून मिळविला. ज्या १०७ जणांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्या हुतात्म्यांना यावतचंद्र दिवाकरौ आपण नमन करायला हवं” असंही मनसेनं पोस्टमध्ये म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns post on martyr memorial day morarji desai sanyukta maharashtra fight rmm

First published on: 21-11-2023 at 14:55 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×