Premium

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “ज्या दिवशी नशिबालाच…”

MNS chief Raj Thackeray 1st Reaction on Uddhav’s Resignation : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

MNS Raj Thackeray Tweet on Uddhav Thackeray
राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Raj Thackeray Tweet on Uddhav Thackeray : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे बहुमत गमावलेल्या उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीसाठी स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर रात्री ९.३० वाजता फेसबुक लाईव्ह करत उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याची घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर राज्यासह देशभरातील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही राजीनाम्याच्या निमित्ताने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर दिली प्रतिक्रिया; म्हणाले “वेळीच निर्णय…”

पृथ्वीराज चव्हाणांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व कौशल्यावर उपस्थित केला प्रश्न; म्हणाले “त्यांच्यात लढण्याची इच्छा नाही”

“एखादा माणूस आपल्या नशिबालाच स्वत:चं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो,” अशी पोस्ट राज ठाकरेंनी शेअर केली आहे. राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंचा उल्लेख टाळला आहे.

उद्धव ठाकरेंचा राजीनामा

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार बुधवारी रात्री कोसळले. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील शक्तिपरीक्षा मात्र टळली. या घडामोडींनंतर भाजपाच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी आजच दावा केला जाणार आहे.

Video : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा अर्थ काय? गिरीश कुबेर यांनी केलेलं विश्लेषण

शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याच्या भाजपच्या पत्रानुसार राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. या बहुमत चाचणीस शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर थोडय़ाच वेळात ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि राजीनामा सादर करण्यासाठी राजभवन गाठले.

‘‘माझा एकही माणूस माझ्याविरोधात उभा राहिला तर ते माझ्यासाठी लाजिरवाणे ठरेल. मला तो खेळच खेळायचा नाही. ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठे केले त्या शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून दूर करण्याचे पुण्य या बंडखोरांना मिळू दे. मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत कधीही नव्हती. मी तुम्हाला सांगून मुख्यमंत्र्यांचे ‘वर्षां’ निवासस्थान सोडले होते. आज सर्वासमोर मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषद आमदारकीचाही त्याग करत आहे’’, असे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री ‘फेसबुक लाईव्ह’द्वारे जाहीर केले. ‘‘मी घाबरणारा नाही, पण कारण नसताना शिवसैनिकांचे रक्त सांडू नये, ही इच्छा आहे. आता पुन्हा शिवसेना उभी करण्यासाठी शिवसेना भवनात बसणार असून तुमची साथ हवी आहे,’’ अशी भावनिक साद ठाकरे यांनी शिवसैनिकांना घातली.

३१ महिने मुख्यमंत्रीपदी

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सत्तेत आले. गेल्याच महिन्यात महाविकास आघाडी सरकारने निम्मा म्हणजे अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. आघाडी सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला होता. पण, शिवसेनेचेच आमदार फुटल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-06-2022 at 13:35 IST
Next Story
संजय राऊतांनी शेअर केला ‘पाठीवर वार’ झाल्याचा फोटो; नितेश राणे उत्तर देत म्हणाले “रिटर्न गिफ्ट”