रत्नागिरी : जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींमध्ये तब्बल ११०० सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. याचबरोबर, ६७ सरपंचांचीही बिनविरोध निवड झाली आहे.जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह १ हजार ७६६ सदस्यपदासाठी निवडणुका घोषित झाल्या आहेत. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून मागे घेण्याचीही मुदत संपली आहे. त्यामुळे आता या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येत राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून ग्रामविकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणुका बिनविरोध करण्यात पुढाकार घेतला. ते काही ठिकाणी यशस्वी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात २२२ सरपंचपदांसाठी छाननीअंती ६३५ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १६२जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ६७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे. जिल्ह्यात मंडणगड १, दापोली ९, खेड २, चिपळूण १३, गुहागर ९, संगमेश्वर १६, रत्नागिरी ६, लांजा २ व राजापूर ९ सरपंच बिनविरोध निवडले गेले आहेत. उर्वरित १५५ सरपंचपदांसाठी ४०६ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी काही ठिकाणी महाविकास आघाडी विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना व भाजप युती अशा लढती आहेत, तर काही ठिकाणी तिरंगी लढती आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than thousand members in gram panchayat elections in ratnagiri district ysh
First published on: 10-12-2022 at 00:02 IST