रवींद्र जुनारकर

नक्षलवादी सामान्य आदिवासींची हत्या करून भीती व दशहत पसरवण्याचे काम करीत असतानाच आज बुधवारी १२ लाखाचे बक्षीस असलेल्या माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी (३४) व भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम (६३) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले. टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाची ही यशस्वी कामगिरी मानली जात आहे.

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
gadchiroli naxalite marathi news
दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo

आत्मसमर्पित नक्षलवादी रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम हा मार्च २००५ ला अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन कार्यरत झाला. तीन महिने पेरमिलीमध्ये कार्यरत होता. मे २००५ पासून तो माड डिव्हिजन टेक्नीकल दलममध्ये कार्यरत होता. २००७ ते २०१२ पर्यंत उप-कमांडर पदावर कार्यरत होता. २०१२ ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर पर्यंत कार्यरत होता. रामसिंगवर १ खून, १ चकमक व इतर १ असे एकूण ३ गुन्हे दाखल आहेत. मौजा कासमपल्ली, गुंडुरवाही, हीकेर, आशा-नैनगुडा, आलदंडी चकमकीत तो सहभागी होता.

रामसिंगवर ३ तर माधुरीवर ३७ गुन्हे दाखल

माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी ही नोव्हेंबर २००२ ला कसनसुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन डिसेंबर २०१२ पर्यंत कार्यरत होती. डिसेंबर २०१२ ते २०१३ पर्यंत ती भामरागड दलममध्ये कार्यरत होती. फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलममध्ये ती एसीएम पदावर कार्यरत होती. माधुरीवर ४ खून, २१ चकमक, ७ जाळपोळ आणि इतर ५ असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत. मौजा वेळमागड, कसनासुर व माडवेली चकमकीमध्ये ती सहभागी होती. शासनाने रामसिंग ऊर्फ सिताराम आत्राम याच्यावर ६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन मट्टामी हिच्यावर देखील ६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. नक्षलवादींनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल यांनी यानिमित्ताने केले आहे.