खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ३ मे नंतर आपली दिशा वेगळी असेल असं मोठं विधान केलं आहे. ३ मे रोजी संभाजीराजेंची खासदारकीची मुदत संपत आहे. त्यामुळे ३ मे नंतर राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. संभाजीराजेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

मंगळवारी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. मतदानानंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी यावेळी ३ मे नंतर माझी राजकीय दिशा स्पष्ट करणार असून ती नक्की वेगळी असेल असं जाहीर केलं. त्यामुळे संभाजीराजे भाजपा, शिवसेना किंवा राष्ट्रवादीत प्रवेश करत नवा घरोबा करणार की आपला नवा पक्ष स्थापन करणार, याची चर्चा रंगली आहे.

Ambadas Danve on asaduddin owaisi
‘खान पाहिजे की बाण?’, बाळासाहेबांची ही भूमिका उबाठा गटाने का बदलली? अंबादास दानवेंनी केलं स्पष्ट
BJP, Sangli, Resignation of former MLA,
माजी आमदाराचा राजीनामा तर पक्षांतर्गत खदखदीमुळे सांगलीत भाजपची चिंता वाढली
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

खासदारकीचा कार्यकाळ संपल्यावर तुमची राजकीय भूमिका काय असेल? असं प्रसारमाध्यमांनी विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “वेट अँड वॉच आहे…३ मे रोजी माझी मुदत संपत आहे. निश्चित वेगळी दिशा असणार यामध्ये काही दुमत नाही. पण काय दिशा असणार आहे त्यासाठी वाट पाहूयात. ३ मे नंतर आपण पुन्हा एकदा बोलू”.