महाराष्ट्रासह दिल्लीतील काँग्रेसच्या नेतृत्वाला आज धक्का बसला. काँग्रेस श्रेष्ठीच्या वर्तुळातील महत्त्वाचे नेते असलेल्या खासदार राजीव सातव यांचं रविवारी पहाटे पाच वाजता निधन झालं. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगिर रुग्णालयात उपचार सुरू होते. करोनावर मात करत असतानाच सातव यांना सायटोमॅजिलो विषाणूचा संसर्ग झाला होता. हा विषाणू नवीन प्रकारचा असून, त्याची लक्षणंही वेगळी आहेत.

सायटोमॅजिलो विषाणू म्हणजे काय?

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
Kerala doctors remove 4 cm-long cockroach from man’s lungs
धक्कादायक! व्यक्तीच्या फुफ्फुसातून बाहेर काढले चक्क झुरळ, केरळच्या डॉक्टरांनी केली ८ तासांची वैद्यकीय प्रक्रिया
Till 31st March Shani Uday Surya Gochar Astrological Events Will Make Mesh To Meen 12 Rashi Rich Money Power Health Marathi Horoscope
३१ मार्चपर्यंत ‘या’ राशी तन-मन-धनाने होतील श्रीमंत; होळी आधी शनी, सूर्यासह ४ ग्रहांचे गोचर, १२ राशींना कसा जाईल मार्च?

सायटोमॅजिलो हा विषाणू सर्वसाधारण विषाणू आहे. अमेरिकेमध्ये ४० वर्ष पूर्ण झालेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात हा विषाणू आढळून येतो. हा विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लाळ किंवा थुंकीद्वारे प्रसरतो.

रोग प्रतिकार शक्ती कमजोर असणाऱ्यांसाठी धोकादायक

या विषाणूंचं करोनासारखंच आहे. ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते, ते या विषाणू संसर्गावर मात करु शकतात. रोग प्रतिकारशक्ती उत्तम असेल तर या विषाणूचा शरीरावर प्रभाव जाणवत नाही. मात्र, ज्या व्यक्तींची रोग प्रतिकार शक्ती कमजोर असते, त्यांच्याशी हा विषाणू धोकादायक ठरु शकतो.

सायटोमॅजिलोची लक्षणं कोणती?

सायटोमॅजिलोचा संसर्ग झाल्यानंतर त्याची प्राथमिक लक्षणंही दिसून येतात. बाधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल जाणवतात. डोकेदुखे, श्वास घेताना अडचण येते, ताप येणे ही सायटोमॅजिलोची लक्षणं आहेत. सायटोमॅजिलोचा संसर्गचं निदान करण्यासाठी रक्ताची चाचणी केली जाते. सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुलांमध्ये देखील आढळतो. याशिवाय गरोदर महिलांमध्येही हा विषाणू आढळून येतो.

“राजीव सातव यांच्यावर करोना आजारावर उपचार सुरू होते. काही दिवसात त्यांच्या आजाराचा रिपोर्ट निगेटिव्ह देखील आला होता. मात्र त्याच दरम्यान त्यांच्या फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यातून ते लवकरात बरे, व्हावे यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निधन झाल्याची घटना घडली,” अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या निधनानंतर माहिती दिली.