काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधत ज्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं असं वक्तव्य केलंय. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर हायकमांडने झापल्यावर गावगुंड समोर आणला असा आरोप केला. याला प्रत्युत्तर देताना पटोले यांनी गावगुंडाला गावगुंड दिसणार असं म्हणत लोक भाजपावाल्यांवर हसत असल्याचं मत व्यक्त केलं. ते नाशिकमध्ये टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारण्याचं काम सुरू आहे. जगाच्या पाठीवर आपल्या देशाची ओळख बेरोजगारांचा देश अशी झालीय. महागाई मोठ्या प्रमाणात वाढलीय. सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालंय. शेतकऱ्यांचे प्रश्न आज मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्रातील सरकार सपशेल अपयशी झालेलं सरकार आहे.”

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
himachal pradesh political crisis
हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
CM Sukhwinder Singh Sukhu
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खूंचा राजीनामा? विरोधकांच्या दाव्यावर सुक्खूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं”

भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर हायकमांडने झापल्यावर गावगुंड समोर आणला असा आरोप केला. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “गावगुंडाला गावगुंड दिसणार आहे. ते आता त्यांना दिसतच आहे. त्यांची कशी अवस्था झालीय हे सर्वांना माहिती आहे. लोकं भाजपावाल्यांवर हसत आहेत. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं. असं झाल्यानंतर काय बाकी राहिलं आहे.”

हेही वाचा : “नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’च्या भूमिकेत आहेत”; बावनकुळेंनी साधला निशाणा

“भाजपाला बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, छोट्या उद्योजकांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न यासाठी निवडून दिलंय. त्यावर त्यांनी लक्ष द्यावं,” असा सल्ला नाना पटोले यांनी भाजपाला दिला. भाजपाने पटोलेंवर पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला. यावर बोलताना पटोले म्हणाले, “आम्ही महात्मा गांधींच्या विचाराची लोकं आहोत. त्यामुळे हे विचार काँग्रेसच्या मनात कधी येऊ शकत नाही. ते विचार त्यांच्याच डोक्यात येऊ शकतात.”