केंद्रीय लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी (१२ जुलै) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे राजनाथ सिंग यांच्यावर रागावल्याच्या पत्रकारांच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. “राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर बोलताना उद्धव ठाकरे घरात होते. ते रागवल्याचं त्यांच्या पत्नीने पाहिले असेल. इतर कुणीही बघितले नाही,” असं मत नारायण राणे यांनी व्यक्त केलं. तसेच उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली. ते नवी मुंबईत एका कार्यक्रमासाठी आले असताना माध्यमांशी बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, “उद्धव ठाकरे राजनाथ सिंह यांच्यावर भडकण्याबाबत जे बोलले ते फोनवरील संभाषण आहे. फोनवर बोलताना उद्धव ठाकरे घरीच होते. ते राजनाथ सिंह यांच्यावर रागावल्याचं त्यांच्या पत्नीनेच पाहिलं. इतर कुणीही ते रागावल्याचं पाहिलं नाही. ते तोंडानेच सांगत आहेत की मी रागावलो होतो.”

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

“उद्धव ठाकरेंनी रागवावं असे त्यांचे दिवस राहिले नाहीत”

“राजनाथ सिंह देशाचे संरक्षण मंत्री आहेत. उद्धव ठाकरेंनी रागवावं असे त्यांचे दिवस राहिले नाहीत. काय वाईट परिस्थिती आली आहे. त्यांना हात जोडत फिरावं लागत आहे,” असाही खोचक टोला राणेंनी लगावला.

हेही वाचा : संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच नारायण राणेंची टीका, म्हणाले “ते काय…”

“या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार नाही”; राऊतांच्या टीकेवर राणेंचं प्रत्युत्तर

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करत त्यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होणार नाही, असा खोचक टोला लगावला. याला प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले, “या सरकारचं मंत्रीमंडळ झालंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्याविषयीच्या प्रश्नांना मी उत्तरं देणार नाही. आज ते कुणीच नाहीत.”