केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकारपरिषद घेत राज्यात विविध मुद्य्यांवरून मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आणि भूमिका मांडली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना, एक कविताही सादर केली.

मी कवी नाही ही कविता दुसऱ्याने केली आहे. कवितेचं शीर्षक आहे, ‘तेव्हा नाही का वाटली लाज?’ असं सांगत नारायण राणेंनी कविता सादर केली –

Sharad pawar ajit pawar
शरद पवारांची भाजपाबरोबरची युती का रखडली? अजित पवारांनी सांगितली अंदर की बात; म्हणाले, “चर्चेकरता निघालो, पण…”
Dr Amol Kolhe on Ajit Pawar karyasamrat
‘माझे काका अभिनय क्षेत्रात नव्हते’, नटसम्राट या टीकेवर अमोल कोल्हेंची अजित पवारांवर खोचक टीका
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
BJP's sitting MP Unmesh Patil from Jalgaon joined Shiv Sena UBT on Wednesday .. Express Photo by Amit Chakravarty
“मला त्या पापात वाटेकरी व्हायचं नाही”, ठाकरे गटात प्रवेश करताच खासदार उन्मेश पाटलांचा भाजपावर गंभीर आरोप

“वाझे सारखे वर्दीतले गुंड जेव्हा तुम्ही पाळले होते, वसुलीचा वाटा घ्यायला हात तुमचे सरसावले होते. अडीच वर्षात लूट केली परवा नव्हती कुणाची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“कोविडची कंत्राटं युवराजाच्या आदेशाने मिळवली, माणसं मरताय कधी खुर्ची नाही सोडली. मेवा खाणे वृत्ती तुमची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“औरंगजेबच्या कबरीवर फुलं उधळली गेली, सत्ता हाती असताना अटकेची हिंमत नाही झाली. छत्रपतींच्या मातीत महती गायली टिपू सुलतानाची तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“मातोश्री दोनचा टॉवर बघा कसा उभा केला, रिसॉर्ट बांधताना कायदा पायदळी तुडवला. मराठी माणूस मुंबईच्या खड्ड्यातच गेला, पाहा तरी एकदा बदली कशीकशी केली कुणाची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“अवकाळी पावसाचं उभं पीक होतं झोडपलं, बांधावर ५० हजार देण्याचं आश्वासन पण दिलं, विमा कंपन्या बळीराजाला लुटताना घेतली होती का बिनपाण्याची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“दाऊदच्या प्रॉपर्टीत मंत्री हिस्सेदार बनला, राजीनामा तर दूर उलट ऐटीतच बसला. कुणाच्या कृपने चंगळ होती अशा खानदानाची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

“मराठा, ओबीसी, आरक्षण होतं गमावलं, सत्ता राखण्याच्या नादात सत्य मात्र लपवलं. मुका मोर्चा म्हणत खिल्ली उडवली त्या समजाची, तेव्हा नाही का वाटली लाज जनाची नाही मनाची?”

हेही वाचा – “… म्हणून उद्धव ठाकरेंनी हिंदू शब्द उच्चारूदेखील नये”; नारायण राणेंची टीका

याशिवाय, “कितीवेळा लाज जनाची नाही मनाची, एखादा माणूस संन्यास घेऊन घरी बसेल. किती लाज काढली आहे, किती प्रकरणं आहेत. ही कविता लोकांपर्यंत पोहचवा. अडीच वर्षे या महाराष्ट्राला जो कलंक लागला होता, तो कसा होता हे लोकांना कळू द्या. परत अशी चूक लोकं करणार नाहीत, याची ते खबरदारी घेतील म्हणून ही कविता वाचून दाखवली आहे.” असंही यावेळी सांगितलं.