NCP Ajit Pawar On Sthanik Swarajya Sanstha Nivadnuk : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) दोन दिवसांचे ‘नवसंकल्प शिबिर’, आजपासून शिर्डी येथे सुरू झाले आहे. यासाठी राज्यातील पक्ष, आघाडी आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत.

दरम्यान आज यासाठी पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील हे सुद्धा शिर्डीला पोहचले आहेत. यावेळी वळसे-पाटील यांनी येत्या काही महिन्यांत होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षांशी आघाडी झाली तर ठिक अन्यथा राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Shiv Sena minister reacts to the NCP's failure in Delhi elections, questioning the possibility of their success so soon.
“राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही…”, दिल्लीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Devendra Fadnavis on Beed Politics
देवेंद्र फडणवीसांचे ‘नवीन बीड’चे आवाहन धनंजय मुंडेंसाठी आणखी एक धक्का आहे का?
Maharashtra Growth Momentum Fadnavis Updates at NITI Aayog
राज्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आराखडा महत्वाचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

दरम्यान सध्या शिर्डी येथे होत असेलेले राष्ट्रवादीचे हे शिबिर सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर येथे होणार होते. मात्र, अचानक त्यामध्ये बदल करत आता ते शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे.

…अन्यथा स्वबळावर

राष्ट्रवादीच्या या अधिवेशनात सहभागी होण्यापूर्वी दिलीप वळसे-पाटील यांनी आज सकाळा सर्वप्रथम साई बाबांचे दर्शन घेतले यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान माध्यमांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विचारण्यात आले.

यावर बोलताना वळसे-पाटील म्हणाले, “आज आणि उद्या होणाऱ्या या शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही निवडणुकीची रणनीति ठरवणार आहोत. सध्या ओबीसी आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे या खटल्याच्या निकालानंतर निवडणुकीची प्रक्रिया आणि कसे लढायचे याबाबत निर्णय होईल. पण, जर आघाडी झाली तर ठीक आहे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) स्वबळावर लढायला तयार आहे.”

बीडमधील घटना गंभीर

दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षातील नेतेही करत आहेत. तसेच राज्यातून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. यावरही दिलीप वळसे-पाटील यांनी भाष्य केले आहे.

यावार बोलताना वळसे-पाटील म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत माझ्यापर्यंत काही माहिती आलेली नाही. जोपर्यंत एखादा व्यक्ती दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर आरोप करणे योग्य नाही. बीडमध्ये जे झालं ते गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा शोध लागला पाहिजे. त्याचबरोबर दोषींना शिक्षाही झाली पाहिजे.”

Story img Loader