या देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं काम सोडलं तर मोदी सरकारचं कुठलंही काम पैलतिरापर्यंत पोहोचलं नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुलडाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान केली. “आता गडकरींच्या मागेही कुणीतरी लागल्याचं दिसतंय” असं म्हणत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

“मंत्रीपद गेलं तरी मला काही फरक पडत नाही”, गडकरींच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा, व्हिडीओ व्हायरल

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपाच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर भाजपामध्ये गडकरींचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, बुलडाण्यातील कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी विविध समस्यांबाबत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी जीवनावश्यक वस्तूंवर कर नव्हता, पेट्रोल-डिझेलने उच्चांक गाठला नव्हता, असे पाटील यावेळी म्हणाले. एकेकाळी ४०० रुपयांना मिळणारं सिलेंडर १२०० रुपयांपर्यंत महाग होईल, असं कधीही वाटलं नसल्याचं पाटील म्हणाले.

“ज्येष्ठांशी कसं वागावं, हे राहुल गांधींना माहित नाही” म्हणत काँग्रेसच्या आणखी एका नेत्याचा राजीनामा; आझाद यांच्यानंतर पक्षाला पुन्हा धक्का!

जनमताविरोधात राज्यांमधील सत्ता उलथवून भाजपाने मतदारांचा आणि भारतीय लोकशाहीचा अवमान केला आहे. आगामी निवडणुकीत हाच निवडणूक कार्यक्रम भाजपा जनतेसमोर मांडणार का? असा सवाल पाटील यांनी केला आहे. राज्यातील शिंदे-भाजपा सरकारलाही पाटील यांनी लक्ष्य केले आहे. “हे सरकार देवाणघेवाणीतून निर्माण झालं आहे. या देवाणघेवाणीचा आकडा ५० खोक्यांपर्यंत गेला आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे रुचेल असं वाटत नाही”, असं पाटील यांनी म्हटलं आहे. या सरकारने मतदारांचा अपेक्षाभंग केल्याने पुढील निवडणूक सोपी नसेल, असं भाकितही त्यांनी वर्तवलं आहे.