महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली असल्याने चांगलीच चर्चा रंगली आहे. वसंत मोरे यांच्या जागी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वसंत मोरे यांची पक्षानं पदावरून उचलबांगडी केल्यानंतर त्यांना इतर पक्षांकडून ऑफर्स येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर दिली असताना रुपाली ठोंबरे यांनीदेखील आता यावर भाष्य केलं आहे. टीव्ही ९ शी बोलताना रुपाली ठोंबरे यांनी वसंत मोरेंना आपण मनसे सोडून जाताना केलेल्या टीकेची आठवण करुन दिली आहे.

काय म्हणाले होते वसंत मोरे –

“आता प्रत्यक्षात रिकामटेकडं कोण आहे ते आता पुणेकरांना कळेलं. मला वाटतं ही रुपाली पाटील यांनी केलेली राजकीय आत्महत्या आहे. रिकामटेकड्यांचा त्रास झाला असं रुपाली पाटील यांनी म्हणणं हा फार मोठा जोक आहे,” असं विधान वसंत मोरे यांनी रुपाली पाटील यांनी मनसे सोडल्यानंतर केलं होतं.

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
इंडिया सत्तेत आल्यास ‘सीएए’ रद्द करणार! माकपच्या टीकेवर चिदम्बरम यांचा खुलासा
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”
young man murdered by throat slit in Ichalkaranjit two accuse were arrested
इचलकरंजीत क्षुल्लक कारणातून तरुणाचा गळा चिरुन खून; दोघांना अटक

रुपाली ठोंबरेंचं उत्तर –

“मी मनसेचा राजीनामा दिला होता त्यावेळी माझे बंधू म्हणाले होते की, ताईची राजकीय आत्महत्या केली. वसंतभाऊ आज तुमची हत्या केली की आत्महत्या आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. तरीदेखील वसंतभाऊसारखा कार्यक्षम लोकप्रतिनीधीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कालही स्वागत केलं आहे. कधी कधी निर्णय घ्यावा लागतो. लोकप्रतीनीधींमध्ये निर्णयक्षमता असावी लागते. कालच वसंत मोरे यांनी निर्णय घेतला असता, तर आज ही वेळ आली नाही,” असं रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

“वसंत मोरेंचं काम आपण पाहिलं आहे, ते खूप चांगलं काम करतात. त्यांना सर्व जातीपातीची लोक मतदान करतात. आज ज्या पद्धतीने ही खांदेपालट झाली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र साईनाथ बाबर यांच्या प्रभागातही मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहे, त्यामुळे ही कुठली खेळी आहे हे कळत नाही,” असेही त्या म्हणाल्या आहेत. मनसेत हेच चालतं असा आरोपही त्यांनी केला.

“वसंत मोरे हे प्रामाणिकपणे काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. मी त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं आहे. मोरे यांना ज्याप्रकारे शहराध्यक्षपदावरून दूर करण्यात आलं, ती दुर्दैवी गोष्ट आहे. मनसेच्या अंतर्गत राजकारणातून ही खेळी खेळली गेली आहे,’ असा आरोप रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. अशाच मनसेच्या खेळींना वैतागून मी मनसे सोडली असंही रुपाली ठोंबरे म्हणाल्या आहेत.