शालेय पोषण आहार योजनेत श्रीगोंदे तालुक्यात मोठा गैरव्यवहार उजेडात दिले आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी जिल्हाभर या योजनेचे गटविकास अधिका-यांमार्फत‘क्रॉस चेकिंग’ करण्याचे आदेश होते, मात्र या आदेशाचे पाच महिन्यांनंतरही पालन झालेले नाही. एकाही तालुक्यात, एकाही गटविकास अधिका-याने या योजनेची तपासणी केलेली नाही. त्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिका-यांनी सर्व गटविकास अधिका-यांना चार स्मरणपत्रे धाडली, मात्र एकाही गटविकास अधिका-याला त्यासाठी अद्यापि वेळ मिळाला नाही.सध्या कोटय़वधी रुपये खर्चून सुरू असलेला शालेय पोषण आहार योजनेस नियंत्रणाअभावी कीड लागल्यासारखी परिस्थिती आहे. योजनेसाठी जिल्ह्य़ात व तालुकानिहाय किती तांदळाचा पुरवठा होतो, धान्यादी माल किती लागतो, याची माहितीच उपलब्ध नाही. योजनेसाठी जिल्हास्तरावर अधीक्षक दर्जाचे स्वतंत्र पद निर्माण करण्यात आलेले आहे, मात्र हे पद रिक्तच आहे, तात्पुरत्या स्वरूपात वेगवेगळ्या अधिका-यांकडे सूत्रे दिली जातात. तालुकास्तरावरही योजनेसाठी पंचायत समितीत अधीक्षक दर्जाचे पद आहे. मात्र जिल्ह्य़ात केवळ पाथर्डी, अकोले व कर्जत या तीनच ठिकाणी या पदावर कर्मचारी कार्यरत आहेत, इतर सर्व तालुक्यांत या पदाचा अतिरिक्त कार्यभार विस्तार अधिका-यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.शिक्षक, मुख्याध्यापकांनी लढा उभारून आहार शिजवण्याच्या कामातून स्वत:ची मुक्तता करून घेतली. त्यानंतर आहार शिजवण्याचे काम महिला बचतगटाकडे सोपवण्याचा आदेश जारी झाला. प्रत्यक्षात जिल्ह्य़ात किती महिला बचतगटांकडे हे सोपवले गेले याची माहितीच जिल्हा परिषदेकडे नाही. असे असले तरी प्राथमिक शिक्षण विभाग मात्र आहार शिजवण्याचा निधी नियमितपणे मुख्याध्यापकाकडे वर्ग करतो आहेच. आहाराचा दर्जा योग्य राहावा यासाठी शहरी भागात मध्यवर्ती स्वयंपाकगृह संकल्पना राबवण्याच्या सूचना आहेत, त्यावर तसेच या आहाराच्या तपासणीसाठी विविध समित्या स्थापन करण्याचे आदेश होते, त्यावरही कार्यवाही झालेली नाही.गेल्या डिसेंबर, जानेवारी दरम्यान श्रीगोंदे तालुक्यात योजनेत बनावट पावत्यांच्या आधारावर मोठा गैरव्यावहार झाल्याचे उघड झाले. पुरवठादार व मुख्याध्यापकांकडील नोंदीत तफावत आढळली होती, त्यासाठी बनावट पावत्या वापरल्या गेल्याचा संशय होता. हा गैरव्यवहार लक्षात घेऊन तत्कालीन मुख्याधिका-यांनी सर्वच तालुक्यात योजनेचे गटविकास अधिका-यांनी ‘क्रॉस चेकिंग’ करावे असा आदेश दिला. तो प्रत्यक्षात उतरलाच नाही. त्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिका-यांनी ७ फेब्रुवारी, १५ एप्रिल, २ जून रोजी स्मरणपत्रे दिली, त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे श्रीगोंदे तालुक्यासारखा गैरव्यवहार जिल्हाभर बिनबोभाटपणे सुरू असल्याचेच स्पष्ट होते. Screen Options Add New Maharashtra News HTML Visual Upload/Insert Insert Slideshow Font size Paragraph Font family Styles Path: p Word count: 301 Preview Status: Draft Edit Visibility: Public Edit Publish immediately , @ : OK Cancel Move to Trash Remove featured image Tags Separate tags with commas X School foodX inspection Choose from the most used tags Check all / none Name Slideshow Mumbai Pune Budget Vruthanta Maharashtra Deshvidesh Krida Manoranja Arthasatta Sampadkiya Viva Chaturang Vasturang Vishesh Lifestyle Kgtocollege Lokrang Diwali Loksabha Ganeshutsav Diwalivishesh Ipl Bmm_convetion Navneet Dailyrashibhavishya Weeklyrashibhavishya Excerpt Excerpts are optional hand-crafted summaries of your content that can be used in your theme. Learn more about manual excerpts. Marathi Title * By Line Sub Title Sub Title 2 Is Home extra news Image 1 No image selected Image 2 No image selected Image 3 No image selected Image 4 No image selected Image 5 No image selected Image 6 No image selected Image 7 No image selected Image 8 No image selected Image 9 No image selected Image 10 No image selected Story Banner No image selected Upgrade to All in One SEO Pack Pro Version Title: characters. Most search engines use a maximum of 60 chars for the title. Description: characters. Most search engines use a maximum of 160 chars for the description. Keywords (comma separated): Disable on this page/post: Thank you for creating with WordPress. Version 3.4.2