scorecardresearch

Premium

“नैतिकतेच्या मुद्द्यावरून…”, ओडिशा रेल्वे अपघातप्रकरणी संजय राऊतांची मोठी मागणी

Sanjay Raut on Odisha Train Accident : या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत.

sanjay raut on ashwini vaishnava
संजय राऊत काय म्हणाले? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Chennai Coromandel Express Accident : ओडिशातील तीन ट्रेनची एकमेकांना धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. काल, शुक्रवारी (२ जून) सायंकाळी सातच्या दरम्यान हा अपघात घडला. या अपघातात आतापर्यंत २३८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. तर, ६५० हून अधिक प्रवासी जखमी असल्याचंही सांगण्यात येतंय. या अपघाताची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी राजीनामा द्यायला हवा, असं वक्तव्य ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे. आज ते नाशिक दौऱ्यावर असून, तिथे त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – संजय राऊत

संजय राऊत म्हणाले की, “या अपघाताविषयी मी कालपासून पाहतोय. खरंतर रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ज्या प्रकराचा अपघात झालाय, पूर्णपणे बेफिकीर. तीन रुटवरून तीन गाड्या आल्या आणि टक्कर झाली. स्वतः रेल्वे मंत्री ओडिसाचे आहेत. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे. इतिहासात लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वे अपघात झाल्यानंतर राजीनामा होता. माधवराव शिंदे यांनी दिला होता. त्यामुळे त्यांनीही राजीनामा द्यावा”, असं संजय राऊत म्हणाले.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!

हेही वाचा >> Odisha train accident : भीषण अपघातानंतर ओडिशामध्ये दुखवटा, मृतांच्या नातेवाईकांना १२ लाखांची मदत जाहीर

चौकशीचे आदेश

दरम्यान, काल (२ जून) सायंकाळी हा अपघात झाल्यानंतर आश्विनी वैष्णव आज सकाळीच घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघात का घडला, कसा घडला यासंबंधित चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा घटनास्थळाची पाहणी करायला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई म्हणून १२ लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: On the issue of ethics sanjay rauts big demand in the odisha train accident case sgk

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×