रत्नागिरी : कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात ट्रक डोंगरकडय़ावर आदळून झालेल्या अपघातात एक महिला ठार झाली असून अन्य एकजण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचा चालक फरार आहे. याबाबतची माहिती अशी की, गुरुवारी रात्री कोल्हापूरहून जयगडकडे चाललेल्या ट्रकमध्ये (एमएच ११- डी डी ०९६७)  रत्नागिरीकडे जाणारे काही प्रवासी बसले होते. ट्रक आंबा घाटात आला असता एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक घाटातील डाव्या बाजूच्या डोंगरकडय़ावर जोरात आदळला. ट्रकच्या केबिनमध्ये बसलेल्या महिला सोनाबाई सखाराम लावनदे (वय ५८ वर्षे) या अपघातामध्ये  ठार झाल्या, तर ज्योतिबा बाबुराव लवनदे, (वय ५२) गंभीर जखमी झाले आहेत.  

सातारा जिल्ह्यातील वासोळे येथील एकाच कुटुंबातील आई, वडील, बहीण, मावस बहीण असे नातेवाईक या ट्रकमध्ये बसले होते. त्यापैकी रामकृष्ण सखाराम लवनदे, सोनाक्का बाबुराव लवनदे,  स्वाती प्रदीप पिसाळ, आरती योगेश झरंडे यांना किरकोळ मार लागला आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची हातखंबा येथील रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यातून मृत व जखमींना साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. अपघातानंतर  ट्रक चालक फरारी झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

accident, Mumbai Nashik highway,
मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
buldhana, Fatal Accident, Samruddhi Highway, One Dead Three Injured, near dusarbid, sindkhed raja taluka, accident on samruddhi mahamarg, accident buldhana samrudhhi
‘समृद्धी’वर मालवाहू वाहनांची धडक; चालक जागीच ठार, तिघे गंभीर
A dumper full of cargo broke into two pieces in an accident nashik
जळगाव: वाळूने भरलेल्या डंपरचे अपघातात दोन तुकडे
Traffic Causes Jam, continuous Holidays, Tourists Head, Lonavala, Mumbai Pune Expressway, marathi news,
सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी, उन्हाळ्यामुळे मुंबईतील पर्यटक लोणावळ्यात दाखल