मागील काही दिवसांपासून शिंदे गटातील नेत्यांकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येत आहे. त्यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण शिवसेनेनं केलेलं नाही. ज्यांना राजकारणाची खुमखुमी आहे. त्यांना दसरा मेळाव्यात शिवतीर्थावर उत्तर मिळेल, असा इशारा दानवे यांनी दिला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्याबाबत विचारलं असता अंबादास दानवे म्हणाले, “राज ठाकरे गेल्या लोकसभेत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणून फिरत होते. तीन-चार महिन्यापूर्वी त्यांनी भोंग्याचा विषय काढला होता. जिथे भोंगे असतील तिथे हनुमान चालीसा लावायची. मात्र, एकाही भोंग्यासमोर हनुमान चालीसा म्हटली गेली नाही.”

Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन
Kolhapur district, election campaign, caste and religion issues, kolhapur, hatkanangale constituency
कोल्हापूरच्या पुरोगामी भूमीत जाती धर्माच्या आधारातून मतांची जुळवाजुळव
Shivsena UBT Criticized Raj Thackeray
“राज ठाकरेंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला, कोल्ह्याला द्राक्षं आंबट”, म्हणत शिवसेना उबाठा नेत्यांची बोचरी टीका
aditya thakceray on shinde group candidate change
“ज्यांनी दिली साथ, त्यांचा केला घात; हेच शिंदे गटाचं ब्रीदवाक्य”, उमेदवार बदलण्यावरून आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

हेही वाचा – “रामदास कदम चिल्लर माणूस, सरड्यापेक्षा जास्त…”; शिवसेनेची घणाघाती टीका

“राज ठाकरेंचे वर्तन…”

“महाविकास आघाडी आणि शिवसेनेला राज ठाकरे जाणीवपूर्वक विरोध करत होते. भाजपाचे ते मित्र होऊ पाहत आहेत. त्यांची भाषा, वर्तन भाजपाशी मिळते जुळते आहे. भाजपाचे लोक त्यांना भेटतात. ते भाजपाच्या लोकांकडे जातात. भाजपाची दुसरी शाखा राज ठाकरेंचा पक्ष मनसे आहे,” असा टोला अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.