सोलापूर : एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांबरोबरच सामान्य रुग्णांनाही बसला आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी परगावहून येणाऱ्या गरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वाचा आधार मानले जाते. सोलापूर जिल्हा ग्रामीणसह शेजारच्या उस्मानाबाद, लातूर तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील विजापूर, बीदर, गुलबर्गा आदी भागातील रुग्ण सोलापुरात येणे पसंत करतात. शासकीय रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयांमध्ये स्थानिक रुग्णांपेक्षा परगावच्या रुग्णांचीच गर्दी जास्त असते.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
Badlapur, electricity power down, citizens, water supply
बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
navi mumbai, Water Supply Worker, neglect, Leads to Flood Like Situation, main valve broke, water entered the chalwl, water supply workers slept, water waste, kopar khairane news, navi mumbai news, water news, marathi news, water leakage in kopar khairane,
नवी मुंबई : निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी, कर्मचाऱ्यांची झोप नडली; रहिवाशांनी रात्र जागून काढली

बहुतांशी सामान्य गरीब रुग्णांना सोलापूरला वैद्यकीय उपचारासाठी येण्याकरिता मुख्यत: एसटी प्रवास करावा लागतो. परंतु एसटी कर्मचारी संपामुळे एसटी बससेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे सामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

खासगी वाहनाने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवड नसल्यामुळे रुग्णांना वैद्यकीय उपचार घेणे अडचणीचे ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दररोज बाह्य उपचार विभागात सरासरी १७०० रुग्ण येतात. यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण परगावचे असतात. गेल्या दोन दिवसांत ही रुग्णसंख्या एक हजारापर्यंत खाली आली आहे. वैद्यकीय उपचारासाठी खासगी रुग्णालयात होणारा खर्च परवडत नाही. खूपच आजारी किंवा गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना खासगी वाहनाचा आधार घेणे अनिवार्य असते.

इतर सामान्य रुग्णांना एसटीचाच आधार घ्यावा लागतो. एसटी बंद असल्यामुळे गरीब रुग्णांना सोलापूरला येणे कठीण झाले असून वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या इतर खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. दुसरीकडे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी काही दिवस दाखल झालेल्या रुग्णांना गावी परतण्यासाठी एसटी बससेवा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे.