शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरून केलेल्या टीकेवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना नकलात्मक टीका केली. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चिडल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांनी सुषमा अंधारे यांची उस्मनाबादेत होणार सभा उधळणार असल्याचा इशारा दिला आहे.

प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देताना राजेंद्र गपाट म्हणाले की, “उद्या उस्मानाबादेत शिवसेना(ठाकरे गट) सुषमा अंधारे यांची सभा आहे, मात्र आम्ही ही सभा उधळून लावणार आहोत. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर खुन्शीने टीका केली आहे. वैचारिक खेळीमेळीचं राजकारण असलं पाहिजे अशी आपली महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. परंतु सुषमा अंधारे या सध्या प्रसिद्धीच्या झोतात असल्याने त्यांचं भान हरवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर गलिच्छ पद्धतीने नकालत्मक टीका केली आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंची सभा आम्ही उधळून लावणार आहोत. यासाठी आम्ही कोणत्याही पातळीवर संघर्ष करण्यास तयार आहोत.”

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
sharad pawar
बारामतीमधील नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेत शरद पवार यांचे नाव; जिल्हा प्रशासनाकडून सुधारित निमंत्रणपत्रिका
bjp candidate for lok sabha election in pune will be decided by party workers
पुण्यात भाजपाचा उमेदवार पदाधिकाऱ्यांकडून होणार निश्चित
Sharad Pawar was given a clear speech by the Collector Office on the invitation of Namo Maha Rozgar Melava
… म्हणून शरद पवार यांना नमो महा रोजगार मेळाव्याचे निमंत्रण नाही; जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ‘ही’ स्पष्टोक्ती

याचबरोबर, “राज ठाकरे यांचे आम्हाला आदेश आहेत की, महिलांना योग्य वागणूक दिली पाहिजे. त्याच प्रमाणे राजकारणातील जी ज्येष्ठ लोक आहेत, आम्ही त्यांच्यावर कधी टीका केली नाही. पण आता जर राज ठाकरे यांच्यावर कोणीही टीका करत असतील, म्हणून या अंगुपंगुची उद्या नक्कीच पुंगी वाजवण्याचा कार्यक्रम केला जाईल.” असंही म्हणाले आहेत.

याशिवाय, “सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. त्यांनी जर माफी मागितली तर आमच्या त्यांना सभेसाठी शुभेच्छा असतील. परंतु जर माफी मागितली नाहीतर राडा होणारच.”